शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इंधन अधिभार दरवाढीवरून परभणीकर संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पासंदर्भात परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, किराणा ...

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पासंदर्भात परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, किराणा दुकानदार, व्यापारी, ऑटोचालक, ज्येष्ठ नागरिक आदींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अनेकांनी परभणीत अगोदरच सर्वाधिक दराने पेट्रोल दिले जाते, आता पुन्हा त्यावर कृषी अधिभार लागणार असल्याने महागाई वाढणार आहे. यावरून संताप व्यक्त केला. हा निर्णय मागे घेण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.

- संगीता आव्हाड, गृहिणी, परभणी

अर्थसंकल्पात पिकांना हमीभाव हा दीडपट करण्याचे वचन देण्यात आले असले तरी याबाबत कसल्याही प्रकारची तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात निराशा आहे.

- अरुणा थोरवे, शेतकरी, धनेगाव

अर्थसंकल्पात गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, कामगार यांच्याविषयी काहीही देण्यात आलेले नाही. सदरील अर्थसंकल्प हा भांडवलदारांच्या हिताचा आहे.

-अप्पाराव मोरताटे, ज्येष्ठ नागरिक

मागील काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल वाढत असल्याने ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. उलट या इंधनावर अधिभार लावण्याचा निर्णय झाल्याने आणखी महागाई वाढून सर्वसामान्यांना त्याच्या झळा सहन सोसाव्या लागणार आहेत.

संभानाथ काळे

या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य नोकरदारांना काहीच दिलासा दिला नाही. करमुक्त सीमा वाढविल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसा निर्णय झाला नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेष कोणतीही तरतूद केली नसल्याने मोबाइलसह इतर उत्पादने महागणार आहेत. त्यामुळे नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प ठरला आहे.

अरुण पवार, नोकरदार.

केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जीएसटीच्या जाचक अटी रद्द करून या कर कायद्यात सुलभता निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याने उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. कृषी क्षेत्रावरच बहुतांश उद्योग आधारलेले आहेत. त्यामुळे कृषीसाठी भरीव तरतूद केल्याने त्याचा फायदा पर्ययाने उद्योग व्यवसायांना मिळणार असून, हा अर्थसंकल्प लोकाभिमुख व उद्योगांना चालना देणारा ठरणार आहे.

सूर्यकांत हाके, व्यापारी.