शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

इंधन अधिभार दरवाढीवरून परभणीकर संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पासंदर्भात परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, किराणा ...

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पासंदर्भात परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, किराणा दुकानदार, व्यापारी, ऑटोचालक, ज्येष्ठ नागरिक आदींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अनेकांनी परभणीत अगोदरच सर्वाधिक दराने पेट्रोल दिले जाते, आता पुन्हा त्यावर कृषी अधिभार लागणार असल्याने महागाई वाढणार आहे. यावरून संताप व्यक्त केला. हा निर्णय मागे घेण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.

- संगीता आव्हाड, गृहिणी, परभणी

अर्थसंकल्पात पिकांना हमीभाव हा दीडपट करण्याचे वचन देण्यात आले असले तरी याबाबत कसल्याही प्रकारची तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात निराशा आहे.

- अरुणा थोरवे, शेतकरी, धनेगाव

अर्थसंकल्पात गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, कामगार यांच्याविषयी काहीही देण्यात आलेले नाही. सदरील अर्थसंकल्प हा भांडवलदारांच्या हिताचा आहे.

-अप्पाराव मोरताटे, ज्येष्ठ नागरिक

मागील काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल वाढत असल्याने ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. उलट या इंधनावर अधिभार लावण्याचा निर्णय झाल्याने आणखी महागाई वाढून सर्वसामान्यांना त्याच्या झळा सहन सोसाव्या लागणार आहेत.

संभानाथ काळे

या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य नोकरदारांना काहीच दिलासा दिला नाही. करमुक्त सीमा वाढविल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसा निर्णय झाला नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेष कोणतीही तरतूद केली नसल्याने मोबाइलसह इतर उत्पादने महागणार आहेत. त्यामुळे नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प ठरला आहे.

अरुण पवार, नोकरदार.

केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात जीएसटीच्या जाचक अटी रद्द करून या कर कायद्यात सुलभता निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याने उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. कृषी क्षेत्रावरच बहुतांश उद्योग आधारलेले आहेत. त्यामुळे कृषीसाठी भरीव तरतूद केल्याने त्याचा फायदा पर्ययाने उद्योग व्यवसायांना मिळणार असून, हा अर्थसंकल्प लोकाभिमुख व उद्योगांना चालना देणारा ठरणार आहे.

सूर्यकांत हाके, व्यापारी.