शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
3
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
4
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
5
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
6
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
7
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
8
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
10
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
11
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
12
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
13
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
14
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
15
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
16
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
17
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
18
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
19
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
20
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

परभणी शहरी भागाची लोटामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:58 IST

स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़केंद्र आणि राज्य शासनाने मागील काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू केले आहे़ या अभियानांतर्गत शहरातील त्याचबरोबर ग्रामीण भागातील स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे़ हगणदारीमुक्त गावे जाहीर करण्याबरोबरच सर्व नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे़ स्वच्छ भारत अभियानातील शौचालय बांधकाम हा महत्त्वपूर्ण घटक आहे़ या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागाला दरवर्षी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले जाते़ शहरी भागात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ शहरातील सार्वजनिक हागणदारीची स्थळे निष्काशीत करण्यात आली आहेत़ त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी शौचालयांचे बांधकामही करण्यात आले आहे़ त्यामुळे शहरी भागामध्ये हे अभियान बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसत आहे़ शौचालयाच्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने प्रोत्साहन अनुदान दिले जात असले तरी शौचलयाचे बांधकाम करण्यासाठी सुरुवातीच्या काळात नागरिकांमध्ये उदासिनता दिसून आली़ परंतु, दरवर्षी या संदर्भाने जनजागृती केली जात असून, त्यात आता नागरिकांची मानसिकता बदलत असल्याचे दिसत आहे़ परभणी महानगरपालिका वगळता ७ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील शौचालय बांधकामांचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच शहरांमध्ये वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यातील सहा शहरांनी २०१९-२० मध्ये दिलेले वैयक्तीक शौचालय बांधकामाची उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ या आठही शहरांसाठी यावर्षी २० हजार ७५२ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी २० हजार ८४ शौचालये बांधून त्यांचा वापरही सुरू झाला आहे़ जवळपास ९४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शहरी भागाची वाटचाल लोटामुक्तीकडे होत आहे़ पाथरी नगरपालिकने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ पाथरी शहरात २ हजार ६७७ शौचालये यावर्षभरात बांधण्यात आली़ त्याचप्रमाणे गंगाखेड ३ हजार ७५, सेलू ३ हजार ३४०, मानवत ३ हजार १५५, सोनपेठ १ हजार ८८२ आणि जिंतूर नगरपालिकेने १ हजार ९४१ शौचालये यावर्षभरात बांधून पूर्ण केली असून, या सर्व शहरांनी उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने या शहरांची वाटचाल लोटामुक्तीकडे झाली आहे़ त्यामुळे शहरी भागात शौचालय वगळून इतर सार्वजनिक स्वच्छता, घनकचºयाचे व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती या बाबीवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे़दोनशहरांचे उद्दिष्ट अपूर्णशहरी भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामात पालम आणि पूर्णा ही दोन्ही शहरे मागे पडली आहेत़ पालम शहरात १ हजार ७४३ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होत़े त्या तुलनेत १ हजार ३५४ शौचालयांचे आतापर्यंत बांधकाम झाले आहे़पूर्णा शहरातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे़ पूर्णा नगरपालिकेने २ हजार ८५० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते़ पालिकेने २ हजार ६६० वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण केली आहेत़या दोन्ही शहरांमध्ये शौचालय बांधकामासाठी आणखी चार महिन्यांचा कालावधी बाकी आहे़ या काळात वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करून ही शहरेही लोटामुक्तीकडे वाटचाल करू शकतात़४शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सध्या जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज ग्रामीण भागामध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले जात असून, शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.४त्याचप्रमाणे ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करुन वापर सुरू केला आहे, अशा ग्रामस्थांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.अभियान : ग्रामीण भागात आव्हान४पाच वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी ग्रामीण भागात अद्यापही या संदर्भात उदासिनता दिसून येत आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण भाग लोटामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३१ हजार ३८३ शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़४त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ३ हजार ५२९, जिंतूर ४ हजार ८५९, मानवत १ हजार ९९०, पालम ३ हजार ५७८, परभणी ५ हजार ४००, पाथरी १ हजार ५२१, पूर्णा ५ हजार २४१, सेलू ४ हजार २२ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १ हजार २४३ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित कण्यात आले आहे़ त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ७ हजार ५७१ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़४ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले, अशा ५ हजार ८४७ ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या वतीने १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे़ ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामाची गती लक्षात घेता या भागात अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करून शौचालय बांधकामे वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार