शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

परभणी शहरी भागाची लोटामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:58 IST

स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़केंद्र आणि राज्य शासनाने मागील काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू केले आहे़ या अभियानांतर्गत शहरातील त्याचबरोबर ग्रामीण भागातील स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे़ हगणदारीमुक्त गावे जाहीर करण्याबरोबरच सर्व नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे़ स्वच्छ भारत अभियानातील शौचालय बांधकाम हा महत्त्वपूर्ण घटक आहे़ या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागाला दरवर्षी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले जाते़ शहरी भागात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ शहरातील सार्वजनिक हागणदारीची स्थळे निष्काशीत करण्यात आली आहेत़ त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी शौचालयांचे बांधकामही करण्यात आले आहे़ त्यामुळे शहरी भागामध्ये हे अभियान बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसत आहे़ शौचालयाच्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने प्रोत्साहन अनुदान दिले जात असले तरी शौचलयाचे बांधकाम करण्यासाठी सुरुवातीच्या काळात नागरिकांमध्ये उदासिनता दिसून आली़ परंतु, दरवर्षी या संदर्भाने जनजागृती केली जात असून, त्यात आता नागरिकांची मानसिकता बदलत असल्याचे दिसत आहे़ परभणी महानगरपालिका वगळता ७ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील शौचालय बांधकामांचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच शहरांमध्ये वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यातील सहा शहरांनी २०१९-२० मध्ये दिलेले वैयक्तीक शौचालय बांधकामाची उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ या आठही शहरांसाठी यावर्षी २० हजार ७५२ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी २० हजार ८४ शौचालये बांधून त्यांचा वापरही सुरू झाला आहे़ जवळपास ९४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शहरी भागाची वाटचाल लोटामुक्तीकडे होत आहे़ पाथरी नगरपालिकने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ पाथरी शहरात २ हजार ६७७ शौचालये यावर्षभरात बांधण्यात आली़ त्याचप्रमाणे गंगाखेड ३ हजार ७५, सेलू ३ हजार ३४०, मानवत ३ हजार १५५, सोनपेठ १ हजार ८८२ आणि जिंतूर नगरपालिकेने १ हजार ९४१ शौचालये यावर्षभरात बांधून पूर्ण केली असून, या सर्व शहरांनी उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने या शहरांची वाटचाल लोटामुक्तीकडे झाली आहे़ त्यामुळे शहरी भागात शौचालय वगळून इतर सार्वजनिक स्वच्छता, घनकचºयाचे व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती या बाबीवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे़दोनशहरांचे उद्दिष्ट अपूर्णशहरी भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामात पालम आणि पूर्णा ही दोन्ही शहरे मागे पडली आहेत़ पालम शहरात १ हजार ७४३ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होत़े त्या तुलनेत १ हजार ३५४ शौचालयांचे आतापर्यंत बांधकाम झाले आहे़पूर्णा शहरातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे़ पूर्णा नगरपालिकेने २ हजार ८५० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते़ पालिकेने २ हजार ६६० वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण केली आहेत़या दोन्ही शहरांमध्ये शौचालय बांधकामासाठी आणखी चार महिन्यांचा कालावधी बाकी आहे़ या काळात वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करून ही शहरेही लोटामुक्तीकडे वाटचाल करू शकतात़४शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सध्या जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज ग्रामीण भागामध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले जात असून, शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.४त्याचप्रमाणे ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करुन वापर सुरू केला आहे, अशा ग्रामस्थांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.अभियान : ग्रामीण भागात आव्हान४पाच वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी ग्रामीण भागात अद्यापही या संदर्भात उदासिनता दिसून येत आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण भाग लोटामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३१ हजार ३८३ शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़४त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ३ हजार ५२९, जिंतूर ४ हजार ८५९, मानवत १ हजार ९९०, पालम ३ हजार ५७८, परभणी ५ हजार ४००, पाथरी १ हजार ५२१, पूर्णा ५ हजार २४१, सेलू ४ हजार २२ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १ हजार २४३ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित कण्यात आले आहे़ त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ७ हजार ५७१ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़४ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले, अशा ५ हजार ८४७ ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या वतीने १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे़ ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामाची गती लक्षात घेता या भागात अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करून शौचालय बांधकामे वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार