शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

परभणी : पक्ष मान्यतेच्या शिलेदारास मंत्रीपदाची लागली आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:05 IST

शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्रात मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा परभणीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

अभिमन्यू कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्रात मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा परभणीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.१९७० च्या दशकापासून निवडणूक लढविणाºया शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता परभणी लोकसभा मतदारसंघाने मिळवून दिली. १९८९ मध्ये या पक्षातर्फे (त्यावेळी पक्ष मान्यता नसल्याने अपक्ष म्हणून नोंद) अशोकराव देशमुख यांनी निवडणूक लढवत तब्बल २ लाख २९ हजार ५६९ (४४.२१ टक्के) मते मिळवित विजय संपादित केला होता. त्यानंतर शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळाली. दोनच वर्षात म्हणजेच १९९१ मध्ये पुन्हा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर अशोकराव देशमुख यांनी निवडणूक लढविली आणि पुन्हा ते २० हजार १६१ मतांनी विजयी झाले. १९८९ पासून सुरु झालेली शिवसेनेची विजयी घोडदौड १९९८ मधील १३ महिन्यांचा कालावधी वगळता ३० वर्षांपासून सातत्याने सुरु आहे. आतापर्यंत तब्बल ७ वेळा पक्षाला विजय मिळवून देत शिवसेनेच्या इतिहासात सुवर्ण क्षणांची नोंद करणाºया परभणीला आतापर्यंत पक्षाकडून काहीही मिळालेले नाही. तसा प्रयत्नही मातोश्रीकडून आतापर्यंत झालेला नाही. परिणामी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वाट्याला अनेकदा विरोधकांचे उपाहासात्मक बोलणे खावे लागले. तरीही स्थानिक पदाधिकाºयांनी मातोश्रीवर चकार शब्द काढला नाही; परंतु, असे किती दिवस न मागता निमूटपणे पक्षासाठी योगदान द्यायचे, असा सवाल आता परभणीकर स्थानिक प्रतिनिधींना विचारु लागले आहेत. परभणीकर शिवसेनेला भरभरुन देतात मग शिवसेनेने परभणीकरांना आता उदात्त हेतूने भरभरुन का देऊ नये, असाही सवाल केला जात आहे.नेत्यांनी पक्ष सोडला तरी शिवसेनेचा दबदबा कायम३० वर्षाच्या कालावधीत अनेकांना पक्षामुळे सन्मानाची पदे मिळाली. त्यानंतर ही अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली; परंतु, परभणीकरांनी मात्र शिवसेनेची साथ सोडली नाही. केंद्रात किंवा राज्यात कोणाचीही सत्ता असो परभणी शिवसेनेचीच, हे समीकरण कायम राहिले आहे. यामध्ये नवनिर्वाचित खा.संजय जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल ४९.७७ टक्के मते मिळवित विजय संपादन केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत तब्बल १५ आजी-माजी लोकप्रतिनिधी विरोधात असताना एकाकी किल्ला लढवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरील भगवा ध्वज खाली उतरु दिला नाही व पक्षाला सन्मानाचा विजय मिळवून दिला. या विजयाची दखल घेऊन शिवसेनेनेही आता जाधव यांच्या रुपाने परभणीकरांना न्याय देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल