शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:02 IST

शहरातील एमआयडीसी भागातील कोरोना बाधित युवकाच्या घराच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेतील १०० हून अधिक अधिकारी- कर्मचारी दोन दिवसांपासून जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच शहरातील इतर भाग आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एमआयडीसी भागातील कोरोना बाधित युवकाच्या घराच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेतील १०० हून अधिक अधिकारी- कर्मचारी दोन दिवसांपासून जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच शहरातील इतर भाग आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.पुण्याहून आलेला एक युवक गुरुवारी सकाळी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहरातील एमआयडीसी भागात महानगरपालिका, पोलीस प्रशासनाने उपाययोजनांना सुरुवात केली. हा युवक ज्या नातेवाईकाच्या घरी आला होता. ते घर केंद्रस्थानी मानून ३ कि.मी. परिसर सील करण्यात आला आहे. त्यानंतर या भागातून कोरोनाचा प्रसार इतर भागात होऊ नये, इतर नागरिकांनाही संसर्ग होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तत्पर भूमिका घेत या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी दुपारी आणि सायंकाळी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली. त्यानंतर दररोज दोन वेळा ही फवारणी करण्याचे काम अग्निशमनचे अधिकारी- कर्मचारी करीत आहेत. हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या भागातून कोणालाही बाहेर पडता येत नाही किंवा येथे येण्यासही प्रतिबंध केला आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून महानगरपालिकेचे १०० अधिकारी- कर्मचारी या ठिकाणी काम करीत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, अग्नीशमन विभागाचे कर्मचारी आदींचा समावेश आहे. या भागातील ४ हजार घरांचे सर्वेक्षण कर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे. त्यात प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन घरात कोणी आजारी आहे का?, ताप, खोकला या सारखा संसर्ग होतो का, याची विचारपूस करुन त्या त्या नागरिकाला आरोग्य सेवा पुरविण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी एकूण २३ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. अस्वच्छतेमुळे रोगाचा फैलाव वाढू नये, या उद्देशाने स्वच्छता कर्मचारी दररोज या भागात नियमित स्वच्छता करीत आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तर दुसरीकडे मनपाचे हे कर्मचारी प्रत्यक्ष कोरोना बाधित युवक आढळल्या स्थळी जावून उपाययोजना करीत आहेत. त्यांच्या या उपाययोजनांमुळेच शहरातील इतर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.अत्यावश्यक सेवेचेही नियोजनकन्टेटमेंट क्षेत्र जाहीर झालेल्या भागातील नागरिकांना घराबाहेर आणि या सीलबंद भागातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा वेळी येथील नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा पुरवायच्या असतील तर त्यासाठीही मनपाने उपाययोजना केली आहे. ही जबाबदारी वसुली लिपिकांना देण्यात आली असून त्यांचे मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात आले आहे. या मोबाईलवर नागरिकांनी फोन केल्यानंतर त्यांना जागेवर अत्यावश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या