शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

बालविवाह लावण्यात परभणी जिल्हा मराठवाड्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:52 IST

मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. परंतु, रुढी, परंपरांचा पगडा अजूनही समाजमनावर कायम असल्याचे दिसत आहे. विवाह योग्य ...

मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. परंतु, रुढी, परंपरांचा पगडा अजूनही समाजमनावर कायम असल्याचे दिसत आहे. विवाह योग्य वय होण्यापूर्वीच मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील ७५ टक्के नागरिक साक्षर आहेत. असे असतानाही मुलींच्या लग्नाच्या बाबतीत मात्र जुन्या रुढीनुसारच विवाह लावले जातात. बालविवाह लावल्याने मुलींच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन आणि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत असले तरी कारवाया वाढत नसल्याने नागिरकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होत नाही. परिणामी बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात बालविवाह वाढले

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले होते. एकीकडे सर्व व्यवहार ठप्प असले तरी गुचचूप विवाह लावून देण्याचे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामध्ये बालविवाहांची संख्या अधिक आहे. बालविवाह उघडकीस आला तर गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाची नजर चुकवून विवाह लावले गेले.

जिल्ह्यात २५० बालसंरक्षक समित्या पाहतात काम

जिल्ह्यात २५० बाल संरक्षक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहतात. तसेच सरपंच या समितीचे अध्यक्ष असून, समितीत अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, तलाठी, आशा वर्कर्स आदींचा समावेश असतो. बालविवाह रोखण्याची जबाबदारी समित्यांवर आहे.

बालविवाह कायदा काय आहे?

१८ वर्षांपेक्षा कमी वयात मुलींचा आणि २१ वर्षापेक्षा कमी वयात मुलांचा विवाह लावल्यास तो बालविवाह ठरतो. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत आई, वडील, नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यात दोषी आढळल्यास शिक्षेस पात्रही ठरू शकतात.

कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात बालसंरक्षण समित्या स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २५० समित्या स्थापन झाल्या असून, प्रत्येक गावनिहाय समिती स्थापन करून या समित्या सक्षम करण्याचे काम केले जाणार आहे. जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी समित्याच्या माध्यमातून समक्षपणे प्रयत्न केले जाणार आहेत.

-रमेश कांगणे, महिला व बालकल्याण अधिकारी