शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह लावण्यात परभणी जिल्हा मराठवाड्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:52 IST

मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. परंतु, रुढी, परंपरांचा पगडा अजूनही समाजमनावर कायम असल्याचे दिसत आहे. विवाह योग्य ...

मुलींच्या शिक्षणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. परंतु, रुढी, परंपरांचा पगडा अजूनही समाजमनावर कायम असल्याचे दिसत आहे. विवाह योग्य वय होण्यापूर्वीच मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील ७५ टक्के नागरिक साक्षर आहेत. असे असतानाही मुलींच्या लग्नाच्या बाबतीत मात्र जुन्या रुढीनुसारच विवाह लावले जातात. बालविवाह लावल्याने मुलींच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग, चाईल्ड लाईन आणि सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत असले तरी कारवाया वाढत नसल्याने नागिरकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होत नाही. परिणामी बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.

कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात बालविवाह वाढले

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले होते. एकीकडे सर्व व्यवहार ठप्प असले तरी गुचचूप विवाह लावून देण्याचे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामध्ये बालविवाहांची संख्या अधिक आहे. बालविवाह उघडकीस आला तर गुन्हा नोंद होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाची नजर चुकवून विवाह लावले गेले.

जिल्ह्यात २५० बालसंरक्षक समित्या पाहतात काम

जिल्ह्यात २५० बाल संरक्षक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहतात. तसेच सरपंच या समितीचे अध्यक्ष असून, समितीत अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, तलाठी, आशा वर्कर्स आदींचा समावेश असतो. बालविवाह रोखण्याची जबाबदारी समित्यांवर आहे.

बालविवाह कायदा काय आहे?

१८ वर्षांपेक्षा कमी वयात मुलींचा आणि २१ वर्षापेक्षा कमी वयात मुलांचा विवाह लावल्यास तो बालविवाह ठरतो. बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत आई, वडील, नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यात दोषी आढळल्यास शिक्षेस पात्रही ठरू शकतात.

कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात बालसंरक्षण समित्या स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २५० समित्या स्थापन झाल्या असून, प्रत्येक गावनिहाय समिती स्थापन करून या समित्या सक्षम करण्याचे काम केले जाणार आहे. जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी समित्याच्या माध्यमातून समक्षपणे प्रयत्न केले जाणार आहेत.

-रमेश कांगणे, महिला व बालकल्याण अधिकारी