शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

परभणी : मांसाहारी खाद्यपदार्थाने तलावातील पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:30 IST

तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा, भूसकवाडी या भागामध्ये छोटे-मोठे २५ तलाव आहेत. या तलावांमध्ये मागील काही दिवसांपासून मांगूर या जातीच्या माशाचे बीज टाकले जाते. या माशांची वाढ लवकर व्हावी, म्हणूून यासाठी या माशांना खाद्य म्हणून कुजलेले सडलेले मास व अन्न टाकले जात आहे. आंध्र प्रदेशातील काही व्यक्ती वाहनाद्वारे हे मांस या भागात आणत असून हे तळ्यामध्ये टाकण्यात येत आहे. मांस टाकल्यामुळे तळ्यातील पाणी दुषित झाले आहे. या भागातील अनेक जनावरे हे दूषित पाणी पीत असल्याने त्यांना आजारांची लागण होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त व घाणेरडे बनले आहे. त्यामुळे या भागामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्र्माण झाली आहे. या माशांच्या जातीवर शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही आंध्र प्रदेशातील कंत्राटदाराने गाव पातळीवरील पुुढाऱ्याला हाताशी धरून हा खेळ सुरू केला आहे. या सर्व प्रकाराला टाकळखोपा व भुसकवाडी येथील काही व्यक्ती जबाबदार आहेत.पाणीपुरवठा योजना आली धोक्यात४मांगूर मासे पालन होणाºया तळ्यामध्ये दर आठवड्याला पाण्याची बदली करण्यात येते. विशेष म्हणजे हे पाणी सिद्धेश्वर जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये सोडले जाते. यामुळे पाणी दूषित होत आहे.४मांगूरच्या प्रादुर्भावामुळे होणारे दूषित पाणी दर आठवड्याला सिद्धेश्वर जलाशयात सोडण्यात येते. या जलाशयातून १६ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परिणामी दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.तात्काळ कावाई करा४टाकळ खोपा, भुसकवाडी या भागांमधील तलावांमध्ये विविध प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्या अरूणा काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfishermanमच्छीमारwater pollutionजल प्रदूषण