शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

परभणी : मांसाहारी खाद्यपदार्थाने तलावातील पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:30 IST

तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा, भूसकवाडी या भागामध्ये छोटे-मोठे २५ तलाव आहेत. या तलावांमध्ये मागील काही दिवसांपासून मांगूर या जातीच्या माशाचे बीज टाकले जाते. या माशांची वाढ लवकर व्हावी, म्हणूून यासाठी या माशांना खाद्य म्हणून कुजलेले सडलेले मास व अन्न टाकले जात आहे. आंध्र प्रदेशातील काही व्यक्ती वाहनाद्वारे हे मांस या भागात आणत असून हे तळ्यामध्ये टाकण्यात येत आहे. मांस टाकल्यामुळे तळ्यातील पाणी दुषित झाले आहे. या भागातील अनेक जनावरे हे दूषित पाणी पीत असल्याने त्यांना आजारांची लागण होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त व घाणेरडे बनले आहे. त्यामुळे या भागामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्र्माण झाली आहे. या माशांच्या जातीवर शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही आंध्र प्रदेशातील कंत्राटदाराने गाव पातळीवरील पुुढाऱ्याला हाताशी धरून हा खेळ सुरू केला आहे. या सर्व प्रकाराला टाकळखोपा व भुसकवाडी येथील काही व्यक्ती जबाबदार आहेत.पाणीपुरवठा योजना आली धोक्यात४मांगूर मासे पालन होणाºया तळ्यामध्ये दर आठवड्याला पाण्याची बदली करण्यात येते. विशेष म्हणजे हे पाणी सिद्धेश्वर जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये सोडले जाते. यामुळे पाणी दूषित होत आहे.४मांगूरच्या प्रादुर्भावामुळे होणारे दूषित पाणी दर आठवड्याला सिद्धेश्वर जलाशयात सोडण्यात येते. या जलाशयातून १६ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परिणामी दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.तात्काळ कावाई करा४टाकळ खोपा, भुसकवाडी या भागांमधील तलावांमध्ये विविध प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्या अरूणा काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfishermanमच्छीमारwater pollutionजल प्रदूषण