शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

परभणी : मांसाहारी खाद्यपदार्थाने तलावातील पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:30 IST

तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही धोक्यात आल्या आहेत.जिंतूर तालुक्यातील टाकळखोपा, भूसकवाडी या भागामध्ये छोटे-मोठे २५ तलाव आहेत. या तलावांमध्ये मागील काही दिवसांपासून मांगूर या जातीच्या माशाचे बीज टाकले जाते. या माशांची वाढ लवकर व्हावी, म्हणूून यासाठी या माशांना खाद्य म्हणून कुजलेले सडलेले मास व अन्न टाकले जात आहे. आंध्र प्रदेशातील काही व्यक्ती वाहनाद्वारे हे मांस या भागात आणत असून हे तळ्यामध्ये टाकण्यात येत आहे. मांस टाकल्यामुळे तळ्यातील पाणी दुषित झाले आहे. या भागातील अनेक जनावरे हे दूषित पाणी पीत असल्याने त्यांना आजारांची लागण होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त व घाणेरडे बनले आहे. त्यामुळे या भागामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्र्माण झाली आहे. या माशांच्या जातीवर शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही आंध्र प्रदेशातील कंत्राटदाराने गाव पातळीवरील पुुढाऱ्याला हाताशी धरून हा खेळ सुरू केला आहे. या सर्व प्रकाराला टाकळखोपा व भुसकवाडी येथील काही व्यक्ती जबाबदार आहेत.पाणीपुरवठा योजना आली धोक्यात४मांगूर मासे पालन होणाºया तळ्यामध्ये दर आठवड्याला पाण्याची बदली करण्यात येते. विशेष म्हणजे हे पाणी सिद्धेश्वर जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये सोडले जाते. यामुळे पाणी दूषित होत आहे.४मांगूरच्या प्रादुर्भावामुळे होणारे दूषित पाणी दर आठवड्याला सिद्धेश्वर जलाशयात सोडण्यात येते. या जलाशयातून १६ गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. परिणामी दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे. यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.तात्काळ कावाई करा४टाकळ खोपा, भुसकवाडी या भागांमधील तलावांमध्ये विविध प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्या अरूणा काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfishermanमच्छीमारwater pollutionजल प्रदूषण