शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

परभणी : विद्यापीठाने संशोधित केलेल्या बायोमिक्सची विक्री कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:44 IST

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक हळदीसह इतर पिकांत येणाऱ्या हुमणी, मर यासारख्या कीडींसाठी रामबाण उपाय ठरले असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सहा महिन्यात सव्वा कोटी रुपयांच्या बायोमिक्सची विक्री झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक हळदीसह इतर पिकांत येणाऱ्या हुमणी, मर यासारख्या कीडींसाठी रामबाण उपाय ठरले असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सहा महिन्यात सव्वा कोटी रुपयांच्या बायोमिक्सची विक्री झाली आहे.पिकांवर येणाºया कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकरी सर्वसाधारणपणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. हे कीटकनाशके वापरल्याने उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय रासायनिक द्रव्यांचा वारंवार वापर केल्याने जमिनीचा कस खालावतो.यावर मात करण्यासाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने बायोमिक्स या जैविकांचे संशोधन केले असून, ते रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे बायोमिक्स परिणामकारक ठरत आहे. वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी मागील दोन वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग करुन बायोमिक्सची निर्मिती केली आहे. यापूर्वीही विद्यापीठात बायोमिक्स तयार केले जात होते, मात्र यावर्षीच्या बायोमिक्सला शेतकºयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हळद या पिकाबरोबरच टरबूज, पपई, डाळिंब या पिकांवर येणाºया रोगांचे नियंत्रण करण्यासाठी बायोमिक्स परिणामकारक ठरले आहे. त्यामुळे बायोमिक्सला शेतकºयांचा चांगला फिडबॅक मिळत आहे.दीडशे रुपयांना एक किलो या प्रमाणे बायोमिक्सची विद्यापीठातून विक्री केली जात आहे. एप्रिल महिन्यापासून शेतकºयांसाठी हे बायोमिक्स शेतकºयांसाठी उपलब्ध करुन दिले असून, दररोज सुमारे तीन टन बायोमिक्सची विक्री होते. सहा महिन्यांमध्ये १ कोटी ३४ लाख रुपयांचे बायोमिक्स विक्री झाल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट यांनी दिली.चौदा घटकांपासून बायोमिक्सची निर्मिती४बायोमिक्स निर्मितीची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. वनस्पती रोगशास्त्र विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि या विभागात पीएच.डी. करणाºया विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पिकांसाठी आवश्यक असलेल्या जिवाणूंचा आणि बुरशीचा शोध घेऊन त्याच्या मिश्रणातून हे बायोमिक्स तयार करण्यात आले.४पिकांना अन्नपुरवठा वाढविणारे जमिनीतील ६, पानांतील एक अशा ७ प्रकारचे जिवाणू आणि सात प्रकारच्या बुरशींचा यासाठी वापर करण्यात आला. या जिवाणूंची विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ठराविक मात्रांपर्यंत वाढ केली जाते आणि त्यानंतर जिवाणू आणि बुरशींचे मिश्रण करुन हे बायोमिक्सची निर्मिती करण्यात आली आहे.कोणत्या पिकांसाठी, कोणत्या रोगावर फायदेशीर...हळद पिकातील हुमणी, मर या रोगांबरोबरच टरबूज,पपई, डाळिंब या पिकांवर येणाºया रोगांचे नियंत्रण करण्यासाठी हे बायोमिक्स परिणामकारक ठरले आहे. याशिवाय खरीप, रबी हंगामातील इतर पिकांसाठी देखील बायोमिक्सचा वापर केला जात आहे.कोणते फायदे झाले?चार किलो बायोमिक्स प्रति एकरी १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करुन द्यावे तसेच १०० ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास पिकांची वाढ चांगली होते. शिवाय रोगांचा बंदोबस्त होतो. हळद पिकात कीडींचा बंदोबस्त तर झालाच, शिवाय हळदीचा पिवळेपणा १ टक्क्याने वाढल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ.कल्याण आपेट यांनी दिली. बायोमिक्सच्या वापराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने राज्यासह गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा इ. भागांतून शेतकरी विद्यापीठाचे बायोमिक्स खरेदी करीत असल्याचेही आपेट यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ