शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

परभणी : एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:58 IST

प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे २ एटीएम आहेत. तर बँक आॅफ बडोदा, आयसीआयसीआय, कॅनरा, धनलक्ष्मी कॉ. बँकेचे प्रत्येकी १ एटीएम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा एटीएमवर पैसे काढण्यावर सर्व ग्राहक, नागरिक भर देत आहेत; परंतु, याच बँकांकडून त्यांनी सुरु केलेल्या एटीमची सुरक्षा करण्यासाठी साधा सुरक्षारक्षकही नेमण्याची तसदी घेतल्या जात नाही. या एटीएमची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. यासर्व बाबींचा भार पोलीस प्रशासनावर पडत आहे. एटीममधून पैसे काढण्याकडे नागरिकांचा जास्त कल असल्याने दिवसभर या एटीएमवर गर्दी दिसूून येते. यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक यांची संख्या लक्षणीय असते. या गर्दीत एटीएम पिन नंबर बघून कार्डाची आदलाबदल होण्याची दाट शक्यता असते. याचा फायदा भूरटे चोर घेण्याची शक्यता बळावली आहे. तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने महिला व महाविद्यालयीन तरुणींनाही विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. छेडछाडीची घटना वाढल्याचे समोर आले आहे. यामुळे बँकांनी एटीएमसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्राहक, नागरिकांमधून केली जात आहे.सुरक्षेकडे कानाडोळा४मागील अनेक दिवसांपासून शहरात चोरीची प्रकरणे वाढली आहेत. दिवसा ढवळ्या आडत व्यापारी वामनराव कोक्कर यांच्या आडत दुकानावरील मुनिमानी बँकेतून काढलेले ५ लाख रुपये लांबविल्याची घटना ताजी असतानाच बँकांकडून ग्राहकांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला जात आहे.४एटीएमवर येणाºया महिला, वयोवृद्ध यांना भूरट्या चोरांकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी एटीएम मशीनच चोरुन नेल्याच्या घटना वाढल्या असल्याने शहरातील बँकांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे अपेक्षीत आहे.बँक प्रशासनाने लक्ष देण्याची गरजच्मानवत शहरात एकीकडे चोरीच्या घटना वाढत असताना बँक प्रशासन मात्र एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नेमण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएमवरून पैसे काढण्यासाठी धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.शहरातील एटीएम असणाºया बँकांना लेखीपत्र देऊन सुरक्षारक्षक नेमण्यासह सीसीटीव्हीची दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही यावर बँक प्रशासनाचा कोणताच निर्णय झाला नाही.-रमेश स्वामी, पोलीस निरीक्षक

टॅग्स :parabhaniपरभणीatmएटीएमbankबँक