शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

परभणी : एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:58 IST

प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे २ एटीएम आहेत. तर बँक आॅफ बडोदा, आयसीआयसीआय, कॅनरा, धनलक्ष्मी कॉ. बँकेचे प्रत्येकी १ एटीएम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा एटीएमवर पैसे काढण्यावर सर्व ग्राहक, नागरिक भर देत आहेत; परंतु, याच बँकांकडून त्यांनी सुरु केलेल्या एटीमची सुरक्षा करण्यासाठी साधा सुरक्षारक्षकही नेमण्याची तसदी घेतल्या जात नाही. या एटीएमची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. यासर्व बाबींचा भार पोलीस प्रशासनावर पडत आहे. एटीममधून पैसे काढण्याकडे नागरिकांचा जास्त कल असल्याने दिवसभर या एटीएमवर गर्दी दिसूून येते. यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक यांची संख्या लक्षणीय असते. या गर्दीत एटीएम पिन नंबर बघून कार्डाची आदलाबदल होण्याची दाट शक्यता असते. याचा फायदा भूरटे चोर घेण्याची शक्यता बळावली आहे. तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने महिला व महाविद्यालयीन तरुणींनाही विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. छेडछाडीची घटना वाढल्याचे समोर आले आहे. यामुळे बँकांनी एटीएमसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्राहक, नागरिकांमधून केली जात आहे.सुरक्षेकडे कानाडोळा४मागील अनेक दिवसांपासून शहरात चोरीची प्रकरणे वाढली आहेत. दिवसा ढवळ्या आडत व्यापारी वामनराव कोक्कर यांच्या आडत दुकानावरील मुनिमानी बँकेतून काढलेले ५ लाख रुपये लांबविल्याची घटना ताजी असतानाच बँकांकडून ग्राहकांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला जात आहे.४एटीएमवर येणाºया महिला, वयोवृद्ध यांना भूरट्या चोरांकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी एटीएम मशीनच चोरुन नेल्याच्या घटना वाढल्या असल्याने शहरातील बँकांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे अपेक्षीत आहे.बँक प्रशासनाने लक्ष देण्याची गरजच्मानवत शहरात एकीकडे चोरीच्या घटना वाढत असताना बँक प्रशासन मात्र एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नेमण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएमवरून पैसे काढण्यासाठी धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.शहरातील एटीएम असणाºया बँकांना लेखीपत्र देऊन सुरक्षारक्षक नेमण्यासह सीसीटीव्हीची दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही यावर बँक प्रशासनाचा कोणताच निर्णय झाला नाही.-रमेश स्वामी, पोलीस निरीक्षक

टॅग्स :parabhaniपरभणीatmएटीएमbankबँक