शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:33 IST

जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १२.८ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे.जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिके वाढीस लागली आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ४ हजार ३२७ शेतकºयांना ४९ कोटी २६ लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ३३१ शेतकºयांना २० कोटी ५२ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार २०२ शेतकºयांना २५ कोटी ४३ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५ हजार ६८७ शेतकºयांना ८२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम जवळपास संपत आला आहे. परंतु बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांचे उद्दीष्ट पूर्ण करुन घेण्यासाठी सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्हा बँकेतून सर्वाधिक कर्ज वाटपच्जिल्ह्यातील सर्वच बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून दिले असताना कर्ज वाटपासाठी केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.च् जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दीष्टाच्या तुलनेत ४८.७८ टक्के कर्ज वाटप केले आहे. खाजगी बँकांनी ३९.११ टक्के कर्ज वाटप केले असून, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने १२.७१ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर वाणिज्य बँकांनी केवळ ४.६८ टक्के कर्ज वाटप केले आहे.च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.कर्जमाफीचा घोळ कायमचच्राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. तसेच दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरुन लाभार्थी शेतकºयांना योजनेचा लाभ दिला होता. असे असताना कर्जमाफीचा घोळ अजूनही मिटला नसल्याचे दिसून येत आहे. कर्ज मागण्यासाठी शेतकरी बँकेत गेल्यानंतर अनेक शेतकºयांना तुमचे पूर्वीचे कर्ज माफ झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन कर्ज दिले जात नाही. त्यामुळे कर्ज माफी मिळाली की नाही, याची माहिती शेतकºयांनाही मिळत नसल्याने योजनेचा घोळ दोन वर्षानंतरही कायम आहे.पीक कर्ज पुनर्गठनास टाळाटाळच्मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करुन नवीन कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी अनेक शेतकºयांची मागणी आहे. मात्र कर्जाचे पुनर्गठन करण्यासही बँका टाळाटाळ करीत आहेत. बँकांच्या या भूमिकेविरुद्ध शेतकरी संघटना तसेच शेतकºयांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र तरीही शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसत आहे. बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करुन घ्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज