शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:33 IST

जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १२.८ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे.जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिके वाढीस लागली आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ४ हजार ३२७ शेतकºयांना ४९ कोटी २६ लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ३३१ शेतकºयांना २० कोटी ५२ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार २०२ शेतकºयांना २५ कोटी ४३ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५ हजार ६८७ शेतकºयांना ८२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम जवळपास संपत आला आहे. परंतु बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांचे उद्दीष्ट पूर्ण करुन घेण्यासाठी सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्हा बँकेतून सर्वाधिक कर्ज वाटपच्जिल्ह्यातील सर्वच बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून दिले असताना कर्ज वाटपासाठी केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.च् जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दीष्टाच्या तुलनेत ४८.७८ टक्के कर्ज वाटप केले आहे. खाजगी बँकांनी ३९.११ टक्के कर्ज वाटप केले असून, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने १२.७१ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर वाणिज्य बँकांनी केवळ ४.६८ टक्के कर्ज वाटप केले आहे.च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.कर्जमाफीचा घोळ कायमचच्राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. तसेच दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरुन लाभार्थी शेतकºयांना योजनेचा लाभ दिला होता. असे असताना कर्जमाफीचा घोळ अजूनही मिटला नसल्याचे दिसून येत आहे. कर्ज मागण्यासाठी शेतकरी बँकेत गेल्यानंतर अनेक शेतकºयांना तुमचे पूर्वीचे कर्ज माफ झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन कर्ज दिले जात नाही. त्यामुळे कर्ज माफी मिळाली की नाही, याची माहिती शेतकºयांनाही मिळत नसल्याने योजनेचा घोळ दोन वर्षानंतरही कायम आहे.पीक कर्ज पुनर्गठनास टाळाटाळच्मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करुन नवीन कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी अनेक शेतकºयांची मागणी आहे. मात्र कर्जाचे पुनर्गठन करण्यासही बँका टाळाटाळ करीत आहेत. बँकांच्या या भूमिकेविरुद्ध शेतकरी संघटना तसेच शेतकºयांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र तरीही शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसत आहे. बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करुन घ्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज