शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

परभणी:१७७ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:33 IST

जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे.परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी हातात पैशांची आवश्यकता असताना बँकांनी मात्र आखडता हात घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यातच जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामात वाटप करावयाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत बँकांनी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करणे अपेक्षित असताना २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ १२.८ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे.जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पिके वाढीस लागली आहेत. पेरणीसाठीच शेतकºयांना पैशांची आवश्यकता भासते. मात्र बँकांना उद्दीष्ट देऊनही वेळेत कर्ज वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतकºयांनी खाजगी सावकारांचे दारे ठोठावून पैसा जमा केला. जर शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळत नसेल तर उपयोग काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निश्चित करुन दिले आहे. मात्र त्या तुलनेत वाणिज्य बँकांनी केवळ ४ हजार ३२७ शेतकºयांना ४९ कोटी २६ लाख रुपये, खाजगी बँकांनी १ हजार ३३१ शेतकºयांना २० कोटी ५२ लाख रुपये, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार २०२ शेतकºयांना २५ कोटी ४३ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५ हजार ६८७ शेतकºयांना ८२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. विशेष म्हणजे, आता खरीप हंगाम जवळपास संपत आला आहे. परंतु बँकांनी अद्यापपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन बँकांचे उद्दीष्ट पूर्ण करुन घेण्यासाठी सूचना कराव्यात व शेतकºयांना वेळेत पैसा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.जिल्हा बँकेतून सर्वाधिक कर्ज वाटपच्जिल्ह्यातील सर्वच बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून दिले असताना कर्ज वाटपासाठी केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.च् जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दीष्टाच्या तुलनेत ४८.७८ टक्के कर्ज वाटप केले आहे. खाजगी बँकांनी ३९.११ टक्के कर्ज वाटप केले असून, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने १२.७१ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर वाणिज्य बँकांनी केवळ ४.६८ टक्के कर्ज वाटप केले आहे.च्बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा पाहता पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे दिसत आहे. कर्ज वाटपाची गती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.च्बँकांनी वेळेत पीक कर्ज दिले तर पिकांवरील फवारणी, खत, कीटकनाशकांच्या खरेदीसाठी हा पैसा शेतकºयांना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पीक कर्जाची मागणी होत आहे.कर्जमाफीचा घोळ कायमचच्राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. तसेच दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरुन लाभार्थी शेतकºयांना योजनेचा लाभ दिला होता. असे असताना कर्जमाफीचा घोळ अजूनही मिटला नसल्याचे दिसून येत आहे. कर्ज मागण्यासाठी शेतकरी बँकेत गेल्यानंतर अनेक शेतकºयांना तुमचे पूर्वीचे कर्ज माफ झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन कर्ज दिले जात नाही. त्यामुळे कर्ज माफी मिळाली की नाही, याची माहिती शेतकºयांनाही मिळत नसल्याने योजनेचा घोळ दोन वर्षानंतरही कायम आहे.पीक कर्ज पुनर्गठनास टाळाटाळच्मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करुन नवीन कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी अनेक शेतकºयांची मागणी आहे. मात्र कर्जाचे पुनर्गठन करण्यासही बँका टाळाटाळ करीत आहेत. बँकांच्या या भूमिकेविरुद्ध शेतकरी संघटना तसेच शेतकºयांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र तरीही शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसत आहे. बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करुन घ्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज