शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

परभणी :९ कोटी खर्चून २४ वर्षानंतरही काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:59 IST

जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे सिरसाळा-सोनपेठ-शिर्शी राज्य मार्ग २२१ रस्त्यावर गोदावरी नदीवर पूल बांधण्याच्या कामास १८ फेब्रुवारी १९९४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ त्यावेळी या पुलाच्या कामाची २ कोटी ६३ लाख ७५ हजार रुपये किंमत होती़ या अंतर्गत मुख्य पूल २६़५० मीटरचे १० गाळे व शिर्शी बाजुचे पोंच मार्ग २२६ मीटर, हटकरवाडी बाजुचे पोंच मार्ग लांबी १२७० मीटर, शिर्शी बाजु पूल मोºया २, हटकरवाडी बाजुच्या पुलाच्या ४ मोºया व संरक्षक कामे आणि अन्य काही बाबींचा या कामाच्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला होता़ हे काम औरंगाबाद येथील एका कंत्राटदारास देण्यात आले़ २०११ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले नाही़ त्यामुळे २० जुलै २०१७ रोजी या कामाला १० कोटी ४१ लाख ९४ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली़ त्यानंतर ६ कोटी ५५ लाख ८८ हजार ३०४ रुपयांच्या कामांची निविदा काढण्यात आली़ याबाबतचा कार्यारंभ आदेश २२ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला़ त्यामध्ये १८ महिन्यांत म्हणजे २१ आॅगस्ट २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते़ परंतु, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली नाही़ परिणामी हे काम रेंगाळल़े़ पुन्हा या कामाला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली़ ही मुदतवाढ संपूनही वर्षभराचा कालावधी लोटला तरीही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही़ त्यामुळे या पुलावरून अधिकृतपणे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही़ आतापर्यंत या पुलाच्या कामात मुख्य पुलाचे ९ स्लॅब पूर्ण झाले असून, पोंच मार्गातील पूल, मोºया, पोंच मार्ग प्रगतीत आहेत़ शेवटच्या एका स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे़ हा प्रगतीपथ कधी पूर्ण होईल? हे अद्याप निश्चित नाही़शिवाय हे काम कधी पूर्ण करणार याबाबतचा जाबही सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणी विचारत नाही़ जुलै महिन्यात जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या राज्य विधान मंडळाच्या अंदाज समितीकडे या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या़ त्यावेळी या समितीचे अध्यक्ष आ़ उदय सामंत यांनी या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असे सांगितले होते़ परंतु, सामंत यांच्या आश्वासनानंतरही तब्बल सहा महिन्यांत काहीही हलचाल झालेली नाही़ त्यामुळे प्रशासकीय उदासिनतेचा फटका या पुलाच्या कामास बसत आहे़ परिणामी या भागातील ग्रामस्थांच्या रहदारीचा प्रश्न तब्बल २४ वर्षानंतरही सुटलेला नाही...तर मुख्यालयाचे ३५ किमी अंतर कमी होणार४गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास परभणीहून सोनपेठला जाण्यासाठी किंवा सोनपेठहून परभणीला येण्यासाठीचे ३५ किमीचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय परभणीहून परळी, सिरसाळा, लातूरला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे़ यामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे़ सध्या परभणी ते सोनपेठ प्रवासाचे अंतर ८० कि.मी.आहे. शिवाय या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.