शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

परभणी :९ कोटी खर्चून २४ वर्षानंतरही काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:59 IST

जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे सिरसाळा-सोनपेठ-शिर्शी राज्य मार्ग २२१ रस्त्यावर गोदावरी नदीवर पूल बांधण्याच्या कामास १८ फेब्रुवारी १९९४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ त्यावेळी या पुलाच्या कामाची २ कोटी ६३ लाख ७५ हजार रुपये किंमत होती़ या अंतर्गत मुख्य पूल २६़५० मीटरचे १० गाळे व शिर्शी बाजुचे पोंच मार्ग २२६ मीटर, हटकरवाडी बाजुचे पोंच मार्ग लांबी १२७० मीटर, शिर्शी बाजु पूल मोºया २, हटकरवाडी बाजुच्या पुलाच्या ४ मोºया व संरक्षक कामे आणि अन्य काही बाबींचा या कामाच्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला होता़ हे काम औरंगाबाद येथील एका कंत्राटदारास देण्यात आले़ २०११ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले नाही़ त्यामुळे २० जुलै २०१७ रोजी या कामाला १० कोटी ४१ लाख ९४ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली़ त्यानंतर ६ कोटी ५५ लाख ८८ हजार ३०४ रुपयांच्या कामांची निविदा काढण्यात आली़ याबाबतचा कार्यारंभ आदेश २२ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला़ त्यामध्ये १८ महिन्यांत म्हणजे २१ आॅगस्ट २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते़ परंतु, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली नाही़ परिणामी हे काम रेंगाळल़े़ पुन्हा या कामाला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली़ ही मुदतवाढ संपूनही वर्षभराचा कालावधी लोटला तरीही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही़ त्यामुळे या पुलावरून अधिकृतपणे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही़ आतापर्यंत या पुलाच्या कामात मुख्य पुलाचे ९ स्लॅब पूर्ण झाले असून, पोंच मार्गातील पूल, मोºया, पोंच मार्ग प्रगतीत आहेत़ शेवटच्या एका स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे़ हा प्रगतीपथ कधी पूर्ण होईल? हे अद्याप निश्चित नाही़शिवाय हे काम कधी पूर्ण करणार याबाबतचा जाबही सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणी विचारत नाही़ जुलै महिन्यात जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या राज्य विधान मंडळाच्या अंदाज समितीकडे या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या़ त्यावेळी या समितीचे अध्यक्ष आ़ उदय सामंत यांनी या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असे सांगितले होते़ परंतु, सामंत यांच्या आश्वासनानंतरही तब्बल सहा महिन्यांत काहीही हलचाल झालेली नाही़ त्यामुळे प्रशासकीय उदासिनतेचा फटका या पुलाच्या कामास बसत आहे़ परिणामी या भागातील ग्रामस्थांच्या रहदारीचा प्रश्न तब्बल २४ वर्षानंतरही सुटलेला नाही...तर मुख्यालयाचे ३५ किमी अंतर कमी होणार४गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास परभणीहून सोनपेठला जाण्यासाठी किंवा सोनपेठहून परभणीला येण्यासाठीचे ३५ किमीचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय परभणीहून परळी, सिरसाळा, लातूरला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे़ यामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे़ सध्या परभणी ते सोनपेठ प्रवासाचे अंतर ८० कि.मी.आहे. शिवाय या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.