शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

परभणी :९ कोटी खर्चून २४ वर्षानंतरही काम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:59 IST

जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे सिरसाळा-सोनपेठ-शिर्शी राज्य मार्ग २२१ रस्त्यावर गोदावरी नदीवर पूल बांधण्याच्या कामास १८ फेब्रुवारी १९९४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ त्यावेळी या पुलाच्या कामाची २ कोटी ६३ लाख ७५ हजार रुपये किंमत होती़ या अंतर्गत मुख्य पूल २६़५० मीटरचे १० गाळे व शिर्शी बाजुचे पोंच मार्ग २२६ मीटर, हटकरवाडी बाजुचे पोंच मार्ग लांबी १२७० मीटर, शिर्शी बाजु पूल मोºया २, हटकरवाडी बाजुच्या पुलाच्या ४ मोºया व संरक्षक कामे आणि अन्य काही बाबींचा या कामाच्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला होता़ हे काम औरंगाबाद येथील एका कंत्राटदारास देण्यात आले़ २०११ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले नाही़ त्यामुळे २० जुलै २०१७ रोजी या कामाला १० कोटी ४१ लाख ९४ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली़ त्यानंतर ६ कोटी ५५ लाख ८८ हजार ३०४ रुपयांच्या कामांची निविदा काढण्यात आली़ याबाबतचा कार्यारंभ आदेश २२ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला़ त्यामध्ये १८ महिन्यांत म्हणजे २१ आॅगस्ट २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते़ परंतु, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली नाही़ परिणामी हे काम रेंगाळल़े़ पुन्हा या कामाला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली़ ही मुदतवाढ संपूनही वर्षभराचा कालावधी लोटला तरीही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही़ त्यामुळे या पुलावरून अधिकृतपणे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही़ आतापर्यंत या पुलाच्या कामात मुख्य पुलाचे ९ स्लॅब पूर्ण झाले असून, पोंच मार्गातील पूल, मोºया, पोंच मार्ग प्रगतीत आहेत़ शेवटच्या एका स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे़ हा प्रगतीपथ कधी पूर्ण होईल? हे अद्याप निश्चित नाही़शिवाय हे काम कधी पूर्ण करणार याबाबतचा जाबही सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणी विचारत नाही़ जुलै महिन्यात जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या राज्य विधान मंडळाच्या अंदाज समितीकडे या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या़ त्यावेळी या समितीचे अध्यक्ष आ़ उदय सामंत यांनी या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असे सांगितले होते़ परंतु, सामंत यांच्या आश्वासनानंतरही तब्बल सहा महिन्यांत काहीही हलचाल झालेली नाही़ त्यामुळे प्रशासकीय उदासिनतेचा फटका या पुलाच्या कामास बसत आहे़ परिणामी या भागातील ग्रामस्थांच्या रहदारीचा प्रश्न तब्बल २४ वर्षानंतरही सुटलेला नाही...तर मुख्यालयाचे ३५ किमी अंतर कमी होणार४गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास परभणीहून सोनपेठला जाण्यासाठी किंवा सोनपेठहून परभणीला येण्यासाठीचे ३५ किमीचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय परभणीहून परळी, सिरसाळा, लातूरला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे़ यामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे़ सध्या परभणी ते सोनपेठ प्रवासाचे अंतर ८० कि.मी.आहे. शिवाय या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.