शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

परभणी : चार जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:07 IST

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे.परभणी विधानसभा मतदारसंघातील १२ इच्छुक उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. त्यामध्ये विखार अहेमद खान, हेमंत भगवानराव साळवे, शेख शकुर शेख इस्माईल, जाकेर अहेमद खान, मोईन अहेमद खान, शेख सलीम शेख इब्राहीम, अख्तर खान अहेसान उल्ला खान, अरुण बाबुराव पवार, अ.सत्तार अ.अजीज शेख, स.शाकेर स.अहेमद, मोईन अहेमद अ.खादर, सुभाष अशोक अंभोरे, निहाल अहेमद कौसडीकर यांचा समावेश आहे. आता येथे एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात राहिले आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद गौस झैन, बहुजन समाज पार्टीच्या प्रतिभा प्रमोद मेश्राम, मनसेचे सचिन भीमराव पाटील, एमआयएमचे अली खान मोईन खान, प्रहार संघटनेचे शिवलिंग महादप्पा बोधने, बहुजन मुक्ती पार्टीचे विनोद अण्णा भोसले, अपक्ष अ‍ॅड.अफजल बेग साहब, अब्दुल जमीर जम्मू, शेख अली शेख नबी, गोविंद रामराव देशमुख, शमीम खान नसीम खान, सुरेश कुंडलिक नागरे आणि संगिता प्रभाकर जगाडे यांचा समावेश आहे.गंगाखेड मतदारसंघातून ८ इच्छुकांनी अर्ज परत घेतले. त्यामुळे येथे १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी परत घेतलेल्यांमध्ये त्र्यंबक मुरकुटे, अभय कुंडगीर, बाळासाहेब निरस, भरत घनदाट, राजाभाऊ फड, धन्यकुमार शिवणकर, सविता मुरकुटे आणि संजय कदम यांचा समावेश आहे. आता येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.मधुसूदन केंद्रे, शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, बहुजन विकास आघाडीचे गजानन गिरी, बसपाचे देवराव खंदारे, मनसेचे विठ्ठलराव जवादे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सखाराम बोबडे, अपक्ष सीताराम घनदाट, बालाजी सगर, तुकाराम वाव्हळे, शेख अजहर, गजानन मरगीळ, संजीव प्रधान आणि संतोष मुरकुटे यांचा समावेश आहे.पाथरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी चार उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. त्यामध्ये डॉ.राम शिंदे, प्रा. प्रल्हाद पाटील, मुंजाजीराव कोल्हे, डॉ.संजय कच्छवे यांचा समावेश आहे. आता निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १० उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे गौतम वैजनाथराव उजगरे, भारतीय जनता पार्टीचे आ.मोहन फड, काँग्रेसचे सुरेश वरपूडकर, आंबेडकर राईट रिपब्लिकन पार्टीचे अजय सोळंके, बहुजन मुक्ती पार्टीचे मोईज अन्सारी अब्दुल कादर, वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर, अपक्ष नारायण चव्हाण, डॉ.जगदीश श्ािंदे, जयजयराम विघ्ने आणि मुजीब आलम बद्रे आलम यांचा समावेश आहे.जिंतूर विधासभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी चार जणांनी आपले अर्ज परत घेतले. त्यामध्ये माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, खंडेराव आघाव, कुरेशी आवेश जिलानी आणि स.दिलावर स.जमाल सहाब यांचा समावेश आहे. आता येथे निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १३ उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे विजय भांबळे, भाजपाच्या मेघना बोर्डीकर, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे अंकुश सीताराम राठोड, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र घनसावध, संभाजी ब्रिगेड पार्टीचे बालाजी शिंदे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे महेंद्र काळे, बहुजन महापार्टीचे दिनकर गायकवाड, अपक्ष राम खराबे, स.जावेद स.आमेर हाश्मी, राजेश भिसे, देवानंद रतत्ने, ज्ञानेश्वर दाभाडे यांचा समावेश आहे.दरम्यान, चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना सोमवारी दुपारी ३ वाजेनंतर चिन्हांचे वाटप करण्यात आले.प्रचारासाठी : १२ दिवसांचाच कालावधी४उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता ८ ते १९ आॅक्टोबर या कालावधीत उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे पुढील १२ दिवसात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.४यानिमित्त देश व राज्य पातळीवरील विविध पक्षांतील नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. या निवडणुकीत अनेक उमेदवार पहिल्यांदाच उतरले असून काही दिग्गज उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये कोणाला यश मिळेल, हे २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.सर्वात कमी उमेदवार पाथरीत४जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे १० उमेदवार पाथरी विधानसभा मतदारसंघात राहिले आहेत. सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १५ उमेदवार गंगाखेड व परभणी मतदारसंघात राहिले असून जिंतूर विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार राहिले आहेत.पाच वर्षानंतर आघाडी आणि महायुती रिंगणात४२०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्ररित्या लढविली होती. यामध्ये राष्ट्रवादीला २ तर शिवसेनेला एका जागी व अपक्ष उमेदवारास एका जागी यश मिळाले.४आता राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली असून शिवसेना- भाजपाची युती झाली आहे. काँग्रेस परभणी व पाथरीची तर राष्ट्रवादी जिंतूर व गंगाखेडची जागा लढवत आहे.४शिवसेना परभणी व गंगाखेडची तर भाजप जिंतूर आणि पाथरीची जागा लढवत आहे. याशिवाय यावर्षी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून या आघाडीचे उमेदवार चारही मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019