शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परभणी : चार जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:07 IST

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २८ इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ४ जागासाठी ५३ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. पुढील १२ दिवस या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु राहणार आहे.परभणी विधानसभा मतदारसंघातील १२ इच्छुक उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. त्यामध्ये विखार अहेमद खान, हेमंत भगवानराव साळवे, शेख शकुर शेख इस्माईल, जाकेर अहेमद खान, मोईन अहेमद खान, शेख सलीम शेख इब्राहीम, अख्तर खान अहेसान उल्ला खान, अरुण बाबुराव पवार, अ.सत्तार अ.अजीज शेख, स.शाकेर स.अहेमद, मोईन अहेमद अ.खादर, सुभाष अशोक अंभोरे, निहाल अहेमद कौसडीकर यांचा समावेश आहे. आता येथे एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात राहिले आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे मोहम्मद गौस झैन, बहुजन समाज पार्टीच्या प्रतिभा प्रमोद मेश्राम, मनसेचे सचिन भीमराव पाटील, एमआयएमचे अली खान मोईन खान, प्रहार संघटनेचे शिवलिंग महादप्पा बोधने, बहुजन मुक्ती पार्टीचे विनोद अण्णा भोसले, अपक्ष अ‍ॅड.अफजल बेग साहब, अब्दुल जमीर जम्मू, शेख अली शेख नबी, गोविंद रामराव देशमुख, शमीम खान नसीम खान, सुरेश कुंडलिक नागरे आणि संगिता प्रभाकर जगाडे यांचा समावेश आहे.गंगाखेड मतदारसंघातून ८ इच्छुकांनी अर्ज परत घेतले. त्यामुळे येथे १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी परत घेतलेल्यांमध्ये त्र्यंबक मुरकुटे, अभय कुंडगीर, बाळासाहेब निरस, भरत घनदाट, राजाभाऊ फड, धन्यकुमार शिवणकर, सविता मुरकुटे आणि संजय कदम यांचा समावेश आहे. आता येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.मधुसूदन केंद्रे, शिवसेनेचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, बहुजन विकास आघाडीचे गजानन गिरी, बसपाचे देवराव खंदारे, मनसेचे विठ्ठलराव जवादे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे सखाराम बोबडे, अपक्ष सीताराम घनदाट, बालाजी सगर, तुकाराम वाव्हळे, शेख अजहर, गजानन मरगीळ, संजीव प्रधान आणि संतोष मुरकुटे यांचा समावेश आहे.पाथरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी चार उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले. त्यामध्ये डॉ.राम शिंदे, प्रा. प्रल्हाद पाटील, मुंजाजीराव कोल्हे, डॉ.संजय कच्छवे यांचा समावेश आहे. आता निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १० उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे गौतम वैजनाथराव उजगरे, भारतीय जनता पार्टीचे आ.मोहन फड, काँग्रेसचे सुरेश वरपूडकर, आंबेडकर राईट रिपब्लिकन पार्टीचे अजय सोळंके, बहुजन मुक्ती पार्टीचे मोईज अन्सारी अब्दुल कादर, वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर, अपक्ष नारायण चव्हाण, डॉ.जगदीश श्ािंदे, जयजयराम विघ्ने आणि मुजीब आलम बद्रे आलम यांचा समावेश आहे.जिंतूर विधासभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी चार जणांनी आपले अर्ज परत घेतले. त्यामध्ये माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, खंडेराव आघाव, कुरेशी आवेश जिलानी आणि स.दिलावर स.जमाल सहाब यांचा समावेश आहे. आता येथे निवडणुकीच्या आखाड्यात एकूण १३ उमेदवार राहिले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे विजय भांबळे, भाजपाच्या मेघना बोर्डीकर, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे अंकुश सीताराम राठोड, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र घनसावध, संभाजी ब्रिगेड पार्टीचे बालाजी शिंदे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे महेंद्र काळे, बहुजन महापार्टीचे दिनकर गायकवाड, अपक्ष राम खराबे, स.जावेद स.आमेर हाश्मी, राजेश भिसे, देवानंद रतत्ने, ज्ञानेश्वर दाभाडे यांचा समावेश आहे.दरम्यान, चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना सोमवारी दुपारी ३ वाजेनंतर चिन्हांचे वाटप करण्यात आले.प्रचारासाठी : १२ दिवसांचाच कालावधी४उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता ८ ते १९ आॅक्टोबर या कालावधीत उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे पुढील १२ दिवसात जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे.४यानिमित्त देश व राज्य पातळीवरील विविध पक्षांतील नेत्यांच्या जाहीर सभा होणार असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. या निवडणुकीत अनेक उमेदवार पहिल्यांदाच उतरले असून काही दिग्गज उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये कोणाला यश मिळेल, हे २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.सर्वात कमी उमेदवार पाथरीत४जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे १० उमेदवार पाथरी विधानसभा मतदारसंघात राहिले आहेत. सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १५ उमेदवार गंगाखेड व परभणी मतदारसंघात राहिले असून जिंतूर विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार राहिले आहेत.पाच वर्षानंतर आघाडी आणि महायुती रिंगणात४२०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्ररित्या लढविली होती. यामध्ये राष्ट्रवादीला २ तर शिवसेनेला एका जागी व अपक्ष उमेदवारास एका जागी यश मिळाले.४आता राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली असून शिवसेना- भाजपाची युती झाली आहे. काँग्रेस परभणी व पाथरीची तर राष्ट्रवादी जिंतूर व गंगाखेडची जागा लढवत आहे.४शिवसेना परभणी व गंगाखेडची तर भाजप जिंतूर आणि पाथरीची जागा लढवत आहे. याशिवाय यावर्षी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून या आघाडीचे उमेदवार चारही मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019