शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

तलाठ्यांना मुख्यालयी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST

सातबारा व फेरबारनोंदीसाठी शासनाकडून देण्यात आलेले डिजिटल सिग्निचन सर्टीफिकेट हे सॉफ्टवेअर संथगतीने सुरू असल्याने, मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांना सातबारा ...

सातबारा व फेरबारनोंदीसाठी शासनाकडून देण्यात आलेले डिजिटल सिग्निचन सर्टीफिकेट हे सॉफ्टवेअर संथगतीने सुरू असल्याने, मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांना सातबारा मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने शेतकरी शहरात तहसील कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. या अनुषंगाने ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढले आहेत. त्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने, या अनुषंगाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी तलाठी यांच्याकडे सातबारा उतारा मिळविण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांना गावातच सातबारा उपलब्ध व्हावा, याकरिता तलाठ्यांनी त्यांचा सज्जा असलेल्या मुख्यालयी नियमित उपस्थित राहावे, तसेच सज्जातील गावांना भेटी देऊन गावातच शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करून द्यावा, या आदेशाची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी करावी, आदेशाचे पालन न करणाऱ्या तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.