शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

१३ हजार शेतकऱ्यांना गुरुवारपर्यंत हमीभावाने कापूस विक्रीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST

परभणी : पणन महासंघाकडून कापूस खरेदीसाठी एसएमएस संदेश पाठवूनही १३ हजार २१८ शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विक्रीसाठी आणला नसून या ...

परभणी : पणन महासंघाकडून कापूस खरेदीसाठी एसएमएस संदेश पाठवूनही १३ हजार २१८ शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विक्रीसाठी आणला नसून या शेतकऱ्यांना आता ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाने हमीभावाने कापूस खरेदीसाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ७ केंद्र सुरु केले आहेत. पणन महासंघाने आतापर्यंत नोंदणी केलेल्या १८ हजार १८ शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून कापूस विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले होते. मात्र २९ जानेवारीपर्यंत ४ हजार ८०० शेतकऱ्यांनीच कापसाची विक्री केली आहे. या काळात १ लाख ४० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १३ हजार २१८ शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला नसावा किंवा अन्य काही कारणांमुळे या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला नाही, असे गृहित धरुन एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांना पणन महासंघाच्या केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी संदर्भातील कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच प्रमाणे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री करणे शिल्लक आहे. या शेतकऱ्यांना कापूसही खरेदी केला जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर, उपसभापती दिलीपराव आवचार, सचिव संजय तळणीकर व संचालकांनी दिली आहे.

भाव वाढल्याचा परिणाम

कापूस पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर कापसाला ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव दिला जात आहे. मात्र या उलट खुल्या बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव वाढले आहेत. व्यापारी ५ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतरही हमीभाव केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.