शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
4
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
5
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
6
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
7
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
9
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
10
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
11
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
12
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
13
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
14
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
15
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
16
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
17
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
18
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
19
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
20
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक असलेली नीट परीक्षा पद्धतीच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत ...

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळतो. त्यामुळे तामिळनाडू सरकारने नीट रद्द करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया येथील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असते. या वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर एकच राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात या परीक्षेची तयारी करून वैद्यकीय प्रवेश मिळविणाऱ्या गुणवंतांची कमी नाही. मात्र अशातच तामिळनाडू सरकारने हीच नीट परीक्षा रद्द करून बारावी परीक्षेच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी परभणीत तज्ज्ञांशी चर्चा केली तेव्हा हा निर्णय धक्कादायक असल्याचे मत तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी नोंदविले. नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. उलट बारावी परीक्षेत तेवढी पारदर्शकता राहत नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा पद्धती योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

काय आधारे तामिळनाडू सरकारचा निर्णय

केंद्राच्या नीट परीक्षेतून तामिळनाडू राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देण्याचे विधेयक तामिळनाडू सरकारने मंजूर केले आहे. त्यामुळे त्या राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेची गरज नाही, तर बारावीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश देण्याची मुभा या विधेयकाने दिली आहे.

नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून, त्यासाठी योग्य आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीच हवी. नीट परीक्षेच्या माध्यमातून ही पारदर्शकता पाळली जाते.

प्रा. संदीप जैस्वाल, तज्ज्ञ

नीट परीक्षेत वस्तुनिष्ठ उत्तरांना महत्त्व असते. तेथे व्यक्तिनिष्ठतेला थारा नाही. शिवाय ही परीक्षा अत्यंत पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थीच या परीक्षेतून निवडले जातात. त्यामुळे नीट परीक्षा पद्धतीच योग्य आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक वाटतो.