शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
5
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
6
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
7
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
8
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
9
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
10
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
11
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
13
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
14
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
15
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
17
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
18
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
19
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
20
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक असलेली नीट परीक्षा पद्धतीच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत ...

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळतो. त्यामुळे तामिळनाडू सरकारने नीट रद्द करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया येथील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असते. या वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर एकच राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात या परीक्षेची तयारी करून वैद्यकीय प्रवेश मिळविणाऱ्या गुणवंतांची कमी नाही. मात्र अशातच तामिळनाडू सरकारने हीच नीट परीक्षा रद्द करून बारावी परीक्षेच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी परभणीत तज्ज्ञांशी चर्चा केली तेव्हा हा निर्णय धक्कादायक असल्याचे मत तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी नोंदविले. नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. उलट बारावी परीक्षेत तेवढी पारदर्शकता राहत नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा पद्धती योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

काय आधारे तामिळनाडू सरकारचा निर्णय

केंद्राच्या नीट परीक्षेतून तामिळनाडू राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देण्याचे विधेयक तामिळनाडू सरकारने मंजूर केले आहे. त्यामुळे त्या राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेची गरज नाही, तर बारावीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश देण्याची मुभा या विधेयकाने दिली आहे.

नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून, त्यासाठी योग्य आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीच हवी. नीट परीक्षेच्या माध्यमातून ही पारदर्शकता पाळली जाते.

प्रा. संदीप जैस्वाल, तज्ज्ञ

नीट परीक्षेत वस्तुनिष्ठ उत्तरांना महत्त्व असते. तेथे व्यक्तिनिष्ठतेला थारा नाही. शिवाय ही परीक्षा अत्यंत पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थीच या परीक्षेतून निवडले जातात. त्यामुळे नीट परीक्षा पद्धतीच योग्य आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक वाटतो.