शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

केवळ 40 हजार शेतकऱ्यांनीच भरला रब्बीतील पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी रिलायन्स ...

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आपली पिके संरक्षित केली होती. मात्र, नुकसान होऊनही या कंपनीने केवळ १८ हजार शेतकऱ्यांनाच ११ कोटी रुपयांची मदत केली. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात आतापर्यंत १ लाख ४० हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी करूनही केवळ २५ हजार ७७० हेक्टरवरील पिके रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केली आहेत. त्यामुळे खरिपात पिकांच्या नुकसानीची मदत न दिल्यामुळेच यावर्षी ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनीच पीक विमा काढला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करण्याकडे पाठ फिरवली आहे.

१२३ कोटींचा भरला हप्ता

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे २५ हजार ६७० हेक्टर संरक्षित करून १ कोटी २३ लाख २० हजार ९५७ रुपयांचा शेतकरी हप्ता भरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के शेतकऱ्यांनीसुद्धा आपली पिके नुकसानीपासून संरक्षित केली नाहीत. त्यामुळे विमा कंपन्यांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा

यावर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदत देऊ केली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी प्रशासन पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.