शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

केवळ 40 हजार शेतकऱ्यांनीच भरला रब्बीतील पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी रिलायन्स ...

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आपली पिके संरक्षित केली होती. मात्र, नुकसान होऊनही या कंपनीने केवळ १८ हजार शेतकऱ्यांनाच ११ कोटी रुपयांची मदत केली. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात आतापर्यंत १ लाख ४० हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी करूनही केवळ २५ हजार ७७० हेक्टरवरील पिके रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केली आहेत. त्यामुळे खरिपात पिकांच्या नुकसानीची मदत न दिल्यामुळेच यावर्षी ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनीच पीक विमा काढला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करण्याकडे पाठ फिरवली आहे.

१२३ कोटींचा भरला हप्ता

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे २५ हजार ६७० हेक्टर संरक्षित करून १ कोटी २३ लाख २० हजार ९५७ रुपयांचा शेतकरी हप्ता भरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के शेतकऱ्यांनीसुद्धा आपली पिके नुकसानीपासून संरक्षित केली नाहीत. त्यामुळे विमा कंपन्यांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा

यावर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदत देऊ केली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी प्रशासन पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.