शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

केवळ 40 हजार शेतकऱ्यांनीच भरला रब्बीतील पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी रिलायन्स ...

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आपली पिके संरक्षित केली होती. मात्र, नुकसान होऊनही या कंपनीने केवळ १८ हजार शेतकऱ्यांनाच ११ कोटी रुपयांची मदत केली. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात आतापर्यंत १ लाख ४० हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी करूनही केवळ २५ हजार ७७० हेक्टरवरील पिके रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केली आहेत. त्यामुळे खरिपात पिकांच्या नुकसानीची मदत न दिल्यामुळेच यावर्षी ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनीच पीक विमा काढला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करण्याकडे पाठ फिरवली आहे.

१२३ कोटींचा भरला हप्ता

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे २५ हजार ६७० हेक्टर संरक्षित करून १ कोटी २३ लाख २० हजार ९५७ रुपयांचा शेतकरी हप्ता भरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के शेतकऱ्यांनीसुद्धा आपली पिके नुकसानीपासून संरक्षित केली नाहीत. त्यामुळे विमा कंपन्यांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा

यावर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदत देऊ केली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी प्रशासन पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.