शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

एक हजार चाचण्यांमध्ये आढळले ४३६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे दिलासा निर्माण झाला असला तरी ही आकडेवारी अभास निर्माण ...

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे दिलासा निर्माण झाला असला तरी ही आकडेवारी अभास निर्माण करणारी ठरत आहे. जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्या घटल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. शनिवारी १ हजार ५१ नागरिकांच्या तपासण्या झाल्या. त्यात ४३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआरच्या ५४३ अहवालात २७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. या अहवालांचा पॉझिटिव्हिटी रेट ५१ टक्के एवढा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण नोंद होण्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कोरोनाने मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात ३, आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ५०८ झाली असून, त्यात ४३ हजार ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार १५ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार १५७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २४५, अक्षदा मंगल कार्यालयात ११६, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ८४ रुग्ण उपचार घेत आहेत.

१०३३ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात शनिवारी १ हजार ३३ रुग्णांना कोरोनाची कोणतेही लक्षणे आढळत नसल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली. मागच्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.