शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रुग्ण संख्या घटली, मात्र मृत्युचे सत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यात बुधवारी ७८५ रुग्णांची नोंद झाली असून, ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या घटली ...

परभणी : जिल्ह्यात बुधवारी ७८५ रुग्णांची नोंद झाली असून, ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यूचे सत्र कायम असल्याने जिल्हावासीयांच्या चिंता वाढल्या आहेत.

मागील तीन दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. दररोज ७०० ते ८०० रुग्ण नव्याने नोंद होत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. ५ मे रोजी ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात ४, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ४ आणि खासगी रुग्णालयात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाला २ हजार ५६२ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ७८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ९४६ अहवालांमध्ये ५८३ आणि रॅपिड टेस्टच्या ६१६ अहवालांमध्ये २०२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४० हजार ८०२ झाली असून, त्यापैकी ३१ हजार ९८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ९५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ७ हजार ८६३ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात २१७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४९, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २६४, अक्षता मंगल कार्यालयात १६०, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये १३४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार ४१५ रुग्णांवर होमआयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

८०४ रुग्णांना सुट्टी

जिल्ह्यातील ८०४ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. मागील ३ दिवसांपासून बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे.

पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवर

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी २ हजार ५६५ अहवालांमध्ये ७८५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्याचा दर ३०.६४ टक्के एवढा आहे.