शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

एमआयडीसीच्या भूसंपादनासाठी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST

परभणी : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी तालुक्यातील बाभुळगाव येथे नवीन एम.आय.डी.सी. स्थापन करण्यासंदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष ...

परभणी : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी तालुक्यातील बाभुळगाव येथे नवीन एम.आय.डी.सी. स्थापन करण्यासंदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीला मंजुरी दिली असून, भूसंपादनाच्या प्रक्रियेची नोटीसही जारी केली असल्याची माहिती आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे नवीन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला असून, येत्या सहा महिन्यांत एमआयडीसीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

परभणी जिल्ह्यासाठी नवीन एमआयडीसी कार्यान्वित होण्याचा प्रश्न मागील काही वर्षांपासून रखडला आहे. २०१५ मध्ये परभणी तालुक्यातील बाभुळगाव परिसरात या एमआयडीसीसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, भूसंपादनाची प्रक्रियादेखील रखडली होती. परिणामी, नवीन उद्योग जिल्ह्यात आले नाहीत आणि विकास खुंटला. जिल्ह्याचा औद्योगिक विकास आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने आ.डॉ. राहुल पाटील यांनी या प्रश्नावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यातूनच २१ सप्टेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील यांचीही उपस्थिती होती. परभणी शहरात १९७४ साली महाराष्ट्र औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. या ठिकाणी केवळ १०० हेक्टर जागा असून, नवीन उद्योगांसाठी जागा उपलब्ध नाही. तालुक्यातील अनेक युवक उद्योजक कृषी आधारित व अन्य उद्योग उभारण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, जमिनीअभावी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बाभुळगाव येथे नवीन एमआयडीसी स्थापनेला मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव आ.डॉ. राहुल पाटील यांनी उद्योगमंत्र्यांकडे सादर केला.

त्यानंतर देसाई यांनी या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देत औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असणारी जमीन संपादित करण्यासाठी नोटीसही जारी केली आहे. त्यामुळे नवीन एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

५ हजार युवकांना रोजगार

बाभुळगाव येथे नवीन एमआयडीसीला मंजुरी मिळून भूसंपादनाची नोटीस काढण्यात आल्याने लवकरच या ठिकाणी एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच एम.आय.डी.सी.मुळे लॉकडाऊननंतर अडचणीत आलेल्या उद्योगधंद्यांना चालना मिळणार असल्याचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले.

कोणते प्रकल्प होऊ शकतात कार्यान्वित

जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे कॉटन क्लस्टर या ठिकाणी उभारले जाऊ शकते. त्याचप्रमाणे सोयाबीन उत्पादनातही जिल्हा अग्रेसर आहे. तेव्हा सोयाबीन प्रक्रिया उद्योगांनाही मोठी संधी मिळू शकते. एकंदर जिल्ह्यात कृषीवर आधारित अनेक प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग एमआयडीसीच्या माध्यमातून मोकळा होणार आहे.