शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

२७० गावांमध्ये झाले नाही रोहयोचे एकही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे रोजगार हिरावलेल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामेही मिळाली नाहीत. कोरोनाच्या संसर्ग काळात जिल्ह्यातील तब्बल २७० ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे रोजगार हिरावलेल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामेही मिळाली नाहीत. कोरोनाच्या संसर्ग काळात जिल्ह्यातील तब्बल २७० ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे एकही काम झाले नाही.

मागेल त्याला काम देण्याच्या उद्देशाने रोजगार हमी योजनेची निर्मिती झाली. शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मजुरांना कामे उपलब्ध करून दिली जातात. जिल्ह्यात दीड लाख ॲक्टिव्ह मजूर आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी कोरोना संसर्ग काळात शेकडो मजूर मोठ्या शहरातून गावात परतले. या मजुरांच्या कामाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे असताना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मात्र मजुरांना पुरेशी कामे उपलब्ध होऊ शकली नाहीत.

जिल्ह्यात एकूण ७०४ ग्रामपंचायती असून त्यापैकी तब्बल २७० ग्रामपंचायतींनी या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत एकही काम हाती घेतले नाही. ग्रामपंचायतींच्या मस्टरमध्ये कामांची नोंद झाली नाही. त्यामुळे २७० ग्रामपंचायतींमधील मजुरांना रोजगारासाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागली आहे. कोरोना संसर्ग काळात मदतीचा हात पुढे करण्याऐवजी ग्रामपंचायतीने कामे देण्यास टाळाटाळ केल्याने मजुरांची उपासमार वाढली आहे.

जिंतूर तालुक्यात ५२ ग्रामपंचायती

चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेचे एकही काम न करणाऱ्या गावांच्या यादीत जिंतूर तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील ५२ गावांनी अद्यापपर्यंत रोहयोचे काम सुरू केले नाही. त्यापाठोपाठ परभणी तालुक्यातील ४७, गंगाखेड तालुक्यातील ४२, सेलू तालुक्यातील ४१ गावांमध्ये कामे सुरू झाली नाहीत. मानवत १६, पालम २५, पाथरी २३, सोनपेठ १८ आणि पूर्णा तालुक्यातील आठ गावे अजूनही रोहयोच्या कामांसाठी पुढे आली नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींमधील मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे.

घरकुल, विहिरींची होतात कामे

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल बांधकाम, सार्वजनिक विहीर, वैयक्तिक विहीर, सार्वजनिक वृक्षलागवड, अंगणवाडी, रस्त्याचे बांधकाम आदी कामे केली जातात. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी या कामांना सुरुवात केल्यास मजुरांना रोजगार प्राप्त होतो. मागील आठवड्यात जिल्ह्यात ७४५ कामे सुरू होती. त्यापैकी ग्रामपंचायती अंतर्गत ६८७ कामांचा समावेश आहे. एकूण ९ हजार ४१४ मजुरांच्या हाताला रोहयोतून रोजगार मिळाला आहे. ग्रामपंचायतींनी हाती घेतलेल्या कामांमध्ये वैयक्तिक विहिरीची सर्वाधिक कामे आहेत.