शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

विकासकामांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST

बाजारपेठेतील गर्दी कमी होईना परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन उपाययोजना करीत असले तरी अद्यापपर्यंत बाजारपेठ भागातील गर्दी ...

बाजारपेठेतील गर्दी कमी होईना

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन उपाययोजना करीत असले तरी अद्यापपर्यंत बाजारपेठ भागातील गर्दी कमी झालेली नाही. शहरात फिरणारे काही नागरिक मास्कचा वापर करीत असले तरी फिजिकल डिस्टन्सच्या बाबतीत मात्र पालन होत नाही. गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळे, आठवडे बाजार बंद केला आहे. मात्र बाजारपेठ भागातील गर्दीकडे दुर्लक्ष होत आहे.

बसस्थानक भागात सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात असुविधा असून, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा बसस्थानकावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसपोर्टचे काम लवकर पूर्ण होणार नसल्याने किमान तात्पुरत्या बसस्थानकात सुविधा तरी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

रसवंत्या, शितगृहे पुन्हा सुरू

परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून, उन्हापासून बचाव करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू झाल्या आहेत. शहरात रसवंत्य, शीतगृहे सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आईस्क्रीम पार्लर चालकांनीही तयारी सुरू केली असून, उन्हाळ्यात आईस्क्रीमला मागणी असल्याने साठा वाढविला आहे.

वाहनधारकांच्या अडचणी खड्ड्यांमुळे वाढल्या

परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील रस्ते खराब झाल आहेत. कच्छी बाजारातून जनता मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. या अरुंद रस्त्यावर आधीच वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यातच खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपाने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

उद्यानातील लॉन पाण्याअभावी वाळली

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील लॉन पाण्याअभावी वाळली आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले असले तरी उद्यानाच्या व्यवस्थापनाबाबत अद्याप ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. मागील काही महिन्यांपासून लॉनसाठी पाण्याचे व्यवस्थापन केले नसल्याने ही लॉन वाळली आहे. परिणामी उद्यान ओसाड बनले आहे.

बसफेऱ्या अभावी ग्रामस्थांची गैरसोय

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी महामंडळाने बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागातील बसफेऱ्या प्रवासी मिळत नसल्याने सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.