शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गोन्नत’ उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST

परभणी : राज्य शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर आता ...

परभणी : राज्य शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर आता ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची एकही दिवस शाळा झालेली नाही. अशातच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने थेट आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ६ एप्रिल रोजी एक आदेश काढून घेतला आहे. त्यानंतर ९ व ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही हाच निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर काय नोंद केली जाणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती; परंतु शिक्षण विभागाने याबाबत लेखी आदेश काढून पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आता विद्यार्थी, पालकांना प्रत्यक्ष प्रगतिपत्रक हातात कधी पडते, याकडे लक्ष लागले आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा झाला फायदा

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गेल्या वर्षभरात एकदाही शाळा भरली नसली तर या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आहे. तांत्रिक कारणांमुळे या ऑनलाईन शिक्षणात काही भागांत अडचणी आल्या असल्या तरी अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. अनेक शिक्षकांनी तर आपला अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. त्यामुळे या ऑनलाईन शिक्षणाचा फायदाच झाला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या संदर्भातील सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना लवकरच प्रगतिपत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी

कोरोनामुळे वर्षभर शाळा सुरू झाली नाही; पण गडम सर यांनी दिलेले ऑनलाईन शिक्षण व स्वाध्याय यावरच वर्गोन्नती मिळत आहे. खरे तर निकालपत्रात श्रेणीवरून आमची गुणवत्ता कळत होती. मात्र वर्गोन्नतीचा शेरा आल्याने सर्वांना एकाच रांगेत बसावे लागले आहे.

- सोनाली सोनवणे, वालूर

सर्वांसोबत शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती; परंतु यावर्षी शाळा सुरू झाल्याच नाहीत. त्यामुळे वर्षभर घरात बसून कंटाळा आला आहे. एकही दिवस वर्गात न बसता आणि शिक्षक कोण आहेत, हे माहीत न होताच पुढच्या वर्गात जात आहे, याबाबत समाधान वाटत नाही.

- सार्थक गिणगिणे, वालूर

कोरोनामुळे वर्षभर शाळेत न गेल्याने शिक्षकांकडून प्रत्यक्ष शिकवण्याचे काम झाले नाही; पण कटारे सर हे आठवड्यात एक ते दोन वेळा घरी येऊन स्वाध्याय तपासून मार्गदर्शन करीत होते. यावरच यावर्षी मी पुढच्या वर्गात गेले; पण घरात बसून कंटाळा आला आहे.

- प्रणिता मोरे, देवगांवफाटा