शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शहरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्रास दिली जातात औषधी; कारवाईला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरातील विविध औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिली जात आहेत. हा प्रकार नियम डावलणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : शहरातील विविध औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिली जात आहेत. हा प्रकार नियम डावलणारा असला तरी कारवाई होत नसल्याने तो सर्रास सुरू आहे.

कोणत्याही आजारावरील औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांचे प्रिस्क्रिप्शन पाहूनच देणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक औषधी दुकानांवर डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही औषधी दिली जात असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत आढळले. अन्न व औषध प्रशासनाचे औषधी दुकानांवर नियंत्रण असते. मात्र, जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून फारशा कारवाया होत नसल्याने हा प्रकार बळावला असून, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय काही औधषी बिनधास्तपणे दिली जात आहे. याविरुद्ध कारवाई होणे आवश्यक झाले आहे.

कोरोकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?

कोरोनाच्या संसर्ग काळात आणि काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तापाची साथ पसरल्यानंतर हा प्रकार वाढल्याचे दिसून आले.

सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या छोट्या-मोठ्या दुखण्यावर नागरिक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी औषधी दुकान गाठतात.

औषधी दुकानांतूनही दुखणे सांगितल्यास लगेच त्यावर औषधी दिली जाते.

मोजक्याच कारवाया

औषध प्रशासनाकडून वर्षातून एक ते दोन वेळाच औषधी दुकानांची तपासणी केली जाते. या विभागात मनुष्यबळ कमी असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामुळे कारवायांची संख्याही कमी असल्याची माहिती मिळाली.

अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी

नानलपेठ परिसर

शहरातील नानलपेठ भागातील काही औषधी दुकानांची पाहणी केली असता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याचे दिसून आले. औषधी दुकानावर ठराविक दुखणे सांगितल्यास त्यावर लगेच टॅबलेट दिल्या जात असल्याचे दिसून आले. गंभीर आजारासाठी मात्र डॉक्टरांची चिठ्ठीच मागितली जाते.

वसमत रोड

येथील वसमत रोड भागातील काही औषधी दुकानांत अशाच पद्धतीने औषधींची मागणी केली असता नकार मिळाला नाही. ताप, सर्दी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारावर थेट औषधी दुकानातूच औषधी दिली जात असल्याचे दिसून आले. या भागातही गंभीर आजाराच्या औषधी मात्र चिठ्ठीशिवाय मिळाल्या नाहीत.

शहरातील काही औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याने यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात जिल्ह्यात किती कारवाया केल्या याची माहिती मिळू शकली नाही.