शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्रास दिली जातात औषधी; कारवाईला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरातील विविध औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिली जात आहेत. हा प्रकार नियम डावलणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : शहरातील विविध औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिली जात आहेत. हा प्रकार नियम डावलणारा असला तरी कारवाई होत नसल्याने तो सर्रास सुरू आहे.

कोणत्याही आजारावरील औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांचे प्रिस्क्रिप्शन पाहूनच देणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक औषधी दुकानांवर डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही औषधी दिली जात असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत आढळले. अन्न व औषध प्रशासनाचे औषधी दुकानांवर नियंत्रण असते. मात्र, जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून फारशा कारवाया होत नसल्याने हा प्रकार बळावला असून, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय काही औधषी बिनधास्तपणे दिली जात आहे. याविरुद्ध कारवाई होणे आवश्यक झाले आहे.

कोरोकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?

कोरोनाच्या संसर्ग काळात आणि काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तापाची साथ पसरल्यानंतर हा प्रकार वाढल्याचे दिसून आले.

सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या छोट्या-मोठ्या दुखण्यावर नागरिक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी औषधी दुकान गाठतात.

औषधी दुकानांतूनही दुखणे सांगितल्यास लगेच त्यावर औषधी दिली जाते.

मोजक्याच कारवाया

औषध प्रशासनाकडून वर्षातून एक ते दोन वेळाच औषधी दुकानांची तपासणी केली जाते. या विभागात मनुष्यबळ कमी असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामुळे कारवायांची संख्याही कमी असल्याची माहिती मिळाली.

अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी

नानलपेठ परिसर

शहरातील नानलपेठ भागातील काही औषधी दुकानांची पाहणी केली असता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याचे दिसून आले. औषधी दुकानावर ठराविक दुखणे सांगितल्यास त्यावर लगेच टॅबलेट दिल्या जात असल्याचे दिसून आले. गंभीर आजारासाठी मात्र डॉक्टरांची चिठ्ठीच मागितली जाते.

वसमत रोड

येथील वसमत रोड भागातील काही औषधी दुकानांत अशाच पद्धतीने औषधींची मागणी केली असता नकार मिळाला नाही. ताप, सर्दी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारावर थेट औषधी दुकानातूच औषधी दिली जात असल्याचे दिसून आले. या भागातही गंभीर आजाराच्या औषधी मात्र चिठ्ठीशिवाय मिळाल्या नाहीत.

शहरातील काही औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याने यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात जिल्ह्यात किती कारवाया केल्या याची माहिती मिळू शकली नाही.