शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

शहरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्रास दिली जातात औषधी; कारवाईला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरातील विविध औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिली जात आहेत. हा प्रकार नियम डावलणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : शहरातील विविध औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिली जात आहेत. हा प्रकार नियम डावलणारा असला तरी कारवाई होत नसल्याने तो सर्रास सुरू आहे.

कोणत्याही आजारावरील औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांचे प्रिस्क्रिप्शन पाहूनच देणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक औषधी दुकानांवर डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही औषधी दिली जात असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत आढळले. अन्न व औषध प्रशासनाचे औषधी दुकानांवर नियंत्रण असते. मात्र, जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून फारशा कारवाया होत नसल्याने हा प्रकार बळावला असून, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय काही औधषी बिनधास्तपणे दिली जात आहे. याविरुद्ध कारवाई होणे आवश्यक झाले आहे.

कोरोकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?

कोरोनाच्या संसर्ग काळात आणि काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तापाची साथ पसरल्यानंतर हा प्रकार वाढल्याचे दिसून आले.

सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या छोट्या-मोठ्या दुखण्यावर नागरिक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी औषधी दुकान गाठतात.

औषधी दुकानांतूनही दुखणे सांगितल्यास लगेच त्यावर औषधी दिली जाते.

मोजक्याच कारवाया

औषध प्रशासनाकडून वर्षातून एक ते दोन वेळाच औषधी दुकानांची तपासणी केली जाते. या विभागात मनुष्यबळ कमी असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामुळे कारवायांची संख्याही कमी असल्याची माहिती मिळाली.

अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी

नानलपेठ परिसर

शहरातील नानलपेठ भागातील काही औषधी दुकानांची पाहणी केली असता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याचे दिसून आले. औषधी दुकानावर ठराविक दुखणे सांगितल्यास त्यावर लगेच टॅबलेट दिल्या जात असल्याचे दिसून आले. गंभीर आजारासाठी मात्र डॉक्टरांची चिठ्ठीच मागितली जाते.

वसमत रोड

येथील वसमत रोड भागातील काही औषधी दुकानांत अशाच पद्धतीने औषधींची मागणी केली असता नकार मिळाला नाही. ताप, सर्दी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारावर थेट औषधी दुकानातूच औषधी दिली जात असल्याचे दिसून आले. या भागातही गंभीर आजाराच्या औषधी मात्र चिठ्ठीशिवाय मिळाल्या नाहीत.

शहरातील काही औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याने यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात जिल्ह्यात किती कारवाया केल्या याची माहिती मिळू शकली नाही.