शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

बाजारपेठ कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:17 IST

परभणी : जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून, त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता ...

परभणी : जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून, त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वच ठिकाणी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. मात्र शहराच्या प्रमुख रस्त्यांवर दिवसभर नागरिकांची वर्दळ पहावयास मिळाली. त्यामुळे केवळ बाजारपेठेसाठीच संचारबंदी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यास अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १३ व १४ मार्च असे दोन दिवस संचारबंदी लागू केली आहे. १२ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून लागू केलेल्या या संचारबंदीचा अंमल १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. शनिवारी सकाळपासूनच जिल्हाभरात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठेसह गल्ली-बोळातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. तसेच प्रमुख भागात पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावला होता. येथील कच्छी बाजार, गुजरी बाजार, शिवाजी चौक, स्टेशनरोड या भागातील सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात आली. दिवसभरात एकही दुकान उघडण्यात आले नाही. त्यामुळे अनेक दिवसांनंतर प्रथमच बाजारपेठ परिसरात शुकशुकाट पहावयास मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र शहरातील प्रमुख रस्त्यांसह कमी वर्दळीच्या रस्त्यांवरही शनिवारी वाहनांची वर्दळ सुरूच होती. कोणतेही काम नसताना काहीजण वाहने घेऊन घराबाहेर पडल्याचे दिसून आले. या नागरिकांची कुठेही तपासणी झाली नाही. त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर वाहतूक सुरूच होती.

मानवतमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मानवत शहर आणि परिसरात संचारबंदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे, स्वच्छता निरीक्षक ओम चव्हाण, सुभाष लांडगे, लेखापाल सुशील खोडवे, सचिन सोनवणे यांनी शहरात फिरून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. शहरातील बाजारपेठ परिसरातील दुकाने कडकडीत बंद राहिली.

परभणी आगारातील बससेवा ठप्प

एस. टी. महामंडळाच्या परभणी आगारानेही बसफेऱ्या बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्रतिसाद दिला. परभणी आगारातून लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत अशा एकूण ३१८ फेऱ्या दररोज केल्या जातात. शनिवारी मात्र या आगारातून एकही बस धावली नाही. त्यामुळे महामंडळाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ऐन वेळी प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली होती. मात्र जिल्ह्याबाहेरील आगारातून बसफेऱ्या सुरूच असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र या बसगाड्यांना मोठी गर्दी झाली होती. परभणी आगाराच्या बसेस बंद असल्याने बाहेरील आगाराच्या बसेस मात्र फुल्ल होऊन धावल्या.