शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST

राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ...

राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ५००, तर बनवस येथे १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, याबाबतचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेतून आलेला नाही. लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येेथे ३५०, तर सुकणी येथे ८० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला आहे. वंजारवाडी येथेही ५५ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील चिंचोर्डी येथे १११ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने संबंधित गावांना प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असून, तेथे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या गावांमध्ये पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंध करण्यात आला आहे. कोंबड्यांबरोबरच कावळ्यांचा मृत्यू होण्याच्या घटनाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मुगगाव येथे ५ दिवसांत ३२ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ब्रह्वावाडी येथे २ कावळे मृत आढळले आहेत. या जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील १२ गावांना कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हुनगुंदा व जालना जिल्ह्यातील अंकुशनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहरा तालुक्यातील खेड येथे कावळे मृत आढळले आहेत. नांदेडमधील माहूर तालुक्यातील पोकुलवाडी, कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथील कोंबड्या, बदक व कावळ्यांचे नमुने घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. मराठवाड्यात बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीची हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. बर्ड फ्लूच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींची या हेल्पलाईनद्वारे नोंद घेऊन त्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.

बर्ड फ्लू हा विशिष्ट प्रजातींमध्ये पसरणारा आजार आहे. परभणी जिल्ह्यात या आजाराने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ कोंबडी प्रजातीच्या पक्ष्यांमध्येच तसेच मोठ्या संख्येने पाळल्या जाणाऱ्या पक्ष्यांमध्ये हा आजार पसरण्याचा धोका आहे. पाळीव प्राण्यांना या आजाराचा धोका नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

‌-डॉ. सुनील मोडक, पक्षी अभ्यासक, परभणी