शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कवितेतून प्रेम, देशभक्तीचा भावनांकुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:22 IST

परभणी : शहरातील विवेकनगर येथे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कविसंमेलनात देशभक्तीसह प्रेमाच्या कविता सादर करून उपस्थित कवींनी उत्कट ...

परभणी : शहरातील विवेकनगर येथे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कविसंमेलनात देशभक्तीसह प्रेमाच्या कविता सादर करून उपस्थित कवींनी उत्कट भावनांचे सादरीकरण केले.

या कविसंमेलनात कवी महेश देशमुख, दिलीप चारठाणकर, पल्लवी देशपांडे, मधुरा उमरीकर, अनुराधा वायकोस, मनीषा आष्टीकर, संतोष सेलूकर, दीपक कुलकर्णी आदी कवींचा सहभाग होता. ‘ताई धीराची, गुणाची, खंबीर मनाची, मूर्ती ही प्रेमाची, ताई माझी..’ ही कविता महेश देशमुख यांनी सादर केली. ती रसिकांना चांगलीच भावली. ‘आकाश अंथरून खाली, चांदण्यात ती मोहरते.., अलवार मोगरा वेचून, माळता पुलकित होते...!’ ही दिलीप चारठाणकर यांची प्रेम कविता दाद मिळवून गेली. संतोष सेलूकर यांनी ‘या दिव्याच्या सोबतीला ही जिवाची वात आहे, अंतरिची वेदना पुन्हा तेच गीत गात आहे, राहिले कोणत्या दिशेला स्वप्नातले गाव माझे, मी असा वेडावुनी सांगा कुठे जात आहे’ ही कविता सादर केली. मनीषा आष्टीकर यांच्या ‘काळजाच्या पानावर फक्त तुझं नाव रं, अजूनही आठवतो सख्या तुझा गाव रं!’ या कवितेने वातावरण प्रफुल्लित केले. ‘काळजाच्या पायथ्याशी वेदनेचे गाव आहे, हरवलेल्या त्या क्षणांना आठवणींचा वाव आहे..’ ही कविता अनुराधा वायकोस यांनी सादर केली, तर पल्लवी देशपांडे यांनी ‘स्मरते ती भेट अजुनी सख्या, मंतरलेल्या त्या क्षणांची, हात हाती तुझा माझ्या अन्‌ उमगे ती भाषा नजरेची..’ ही कविता सादर केली. प्रवीण वायकोस यांनी सूत्रसंचालन केले. प्रसन्न भावसार, प्रा. कैलास सुळसुळे, बाळासाहेब यादव, प्रवीण चव्हाण, दिलीप घुंबरे, सचिन देशमुख, सुधीर सोनूनकर, मनीषा उमरीकर, प्रिया देशपांडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

का सोडुनी सांग आम्हास गेला.....

मधुरा उमरीकर यांनी देशासाठी लढणारा सैनिक शहीद झाल्यावरची भावना कवितेतून सादर केली. मधुरा म्हणतात... ‘कसा सोडुनी सांग आम्हास गेला, किती जीवनाचा फिका रंग झाला, कसे सांग पोसू तुझ्या अंकुराला, कसा काय बाबा पिलांचा हरवला...’ या कवितेस मोठी दाद मिळाली. या कवितेने उपस्थितांना भावनाविवश केले.