शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

कवितेतून प्रेम, देशभक्तीचा भावनांकुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:22 IST

परभणी : शहरातील विवेकनगर येथे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कविसंमेलनात देशभक्तीसह प्रेमाच्या कविता सादर करून उपस्थित कवींनी उत्कट ...

परभणी : शहरातील विवेकनगर येथे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कविसंमेलनात देशभक्तीसह प्रेमाच्या कविता सादर करून उपस्थित कवींनी उत्कट भावनांचे सादरीकरण केले.

या कविसंमेलनात कवी महेश देशमुख, दिलीप चारठाणकर, पल्लवी देशपांडे, मधुरा उमरीकर, अनुराधा वायकोस, मनीषा आष्टीकर, संतोष सेलूकर, दीपक कुलकर्णी आदी कवींचा सहभाग होता. ‘ताई धीराची, गुणाची, खंबीर मनाची, मूर्ती ही प्रेमाची, ताई माझी..’ ही कविता महेश देशमुख यांनी सादर केली. ती रसिकांना चांगलीच भावली. ‘आकाश अंथरून खाली, चांदण्यात ती मोहरते.., अलवार मोगरा वेचून, माळता पुलकित होते...!’ ही दिलीप चारठाणकर यांची प्रेम कविता दाद मिळवून गेली. संतोष सेलूकर यांनी ‘या दिव्याच्या सोबतीला ही जिवाची वात आहे, अंतरिची वेदना पुन्हा तेच गीत गात आहे, राहिले कोणत्या दिशेला स्वप्नातले गाव माझे, मी असा वेडावुनी सांगा कुठे जात आहे’ ही कविता सादर केली. मनीषा आष्टीकर यांच्या ‘काळजाच्या पानावर फक्त तुझं नाव रं, अजूनही आठवतो सख्या तुझा गाव रं!’ या कवितेने वातावरण प्रफुल्लित केले. ‘काळजाच्या पायथ्याशी वेदनेचे गाव आहे, हरवलेल्या त्या क्षणांना आठवणींचा वाव आहे..’ ही कविता अनुराधा वायकोस यांनी सादर केली, तर पल्लवी देशपांडे यांनी ‘स्मरते ती भेट अजुनी सख्या, मंतरलेल्या त्या क्षणांची, हात हाती तुझा माझ्या अन्‌ उमगे ती भाषा नजरेची..’ ही कविता सादर केली. प्रवीण वायकोस यांनी सूत्रसंचालन केले. प्रसन्न भावसार, प्रा. कैलास सुळसुळे, बाळासाहेब यादव, प्रवीण चव्हाण, दिलीप घुंबरे, सचिन देशमुख, सुधीर सोनूनकर, मनीषा उमरीकर, प्रिया देशपांडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

का सोडुनी सांग आम्हास गेला.....

मधुरा उमरीकर यांनी देशासाठी लढणारा सैनिक शहीद झाल्यावरची भावना कवितेतून सादर केली. मधुरा म्हणतात... ‘कसा सोडुनी सांग आम्हास गेला, किती जीवनाचा फिका रंग झाला, कसे सांग पोसू तुझ्या अंकुराला, कसा काय बाबा पिलांचा हरवला...’ या कवितेस मोठी दाद मिळाली. या कवितेने उपस्थितांना भावनाविवश केले.