शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

भाषेच्या माध्यमातून साहित्य समृद्ध होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

परभणी: भाषा विकसित होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. भाषा आणि समाज एक अतूट असं नातं असतं. भाषा शुद्ध अशुद्ध असूच ...

परभणी: भाषा विकसित होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. भाषा आणि समाज एक अतूट असं नातं असतं. भाषा शुद्ध अशुद्ध असूच शकत नाही पण भाषेतला अस्सलपणा जपला पाहिजे. कारण भाषेच्या माध्यमातून साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन डॉ. आसाराम लोमटे यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ व बी.रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ जानेवारी रोजी बी. रघुनाथ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका सरोज देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी रेणू पाचपोर, डॉ.आसाराम लोमटे यांची उपस्थिती होती. भाषा आणि समाज या विषयावर बोलताना लोमटे म्हणाले की, ज्या प्रमाण भाषेच्या बोली रसरसशीत आहेत. जिवंत आहेत, ती भाषा जास्त समृद्ध होते. लोकभाषा, लोकजीवन व भिन्न भिन्न भाषेच्या समूहाशी संपर्क कमी होत गेला की आपल्याला शब्द कमी पडू लागतात. भाषा केवळ संवादाचे माध्यम आहे, असे नाही तर ते ज्ञान संपादन, ग्रहण करण्याचेही माध्यम आहे, असेही ते म्हणाले. या वेळी रेणू पाचपोर यांनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या. ‘आता, ती नाही, पण भोवती वावरत असते, येता जाता माळ्यावरची, तिची लोखंडी पेटी दिसते, पेटी उघडून पाहण्याचे धाडस मात्र, मला अजिबात होत नाही, वाटते...उघडल्याबरोबर पेटी, बोलण्याचा ..हसण्याचा .. तिचा अचानक आवाज येईल, तिनं जपून जपून ठेवलेले, तेव्हाचे ते पितळी तुकडे, सोन्याचेच आहेत..., असे उगाच वाटून जाईल!’ ही आई विषयावरील कविता सादर केली.

‘सावल्या’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ अशा अनेक दर्जेदार कविता सादर करून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. अध्यक्षीय समारोपात सरोज देशपांडे म्हणाल्या, भाषा आणि साहित्य व भाषा समृद्धीसाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. माणिक पुरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भगवान काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कथाकार राजेंद्र गहाळ, सावित्री चिताडे, प्रा. सखाराम कदम, प्रा.हनुमान व्हरगुळे, अरविंद सगर, गंगाधर गायकवाड, बबन आव्हाड यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.