शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विनाअपघात सेवा देण्यास ४६९ चालक पडले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

परभणी : एस.टी. महामंडळाच्या बसची वाहतूक सुरक्षित समजली जात असली तरी परभणी विभागातील तब्बल ४६९ चालक विनाअपघात सेवा देऊ ...

परभणी : एस.टी. महामंडळाच्या बसची वाहतूक सुरक्षित समजली जात असली तरी परभणी विभागातील तब्बल ४६९ चालक विनाअपघात सेवा देऊ शकले नाहीत, हे सत्य नाकारून चालणार नाही. मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता ३८१ चालक उत्कृष्ट सेवा बजावीत बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.

‘गाव तेथे एसटी’ असे बिरुद घेऊन महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाची बस वाहतूक केली जाते. प्रत्येक गावापर्यंत एस.टी.चे जाळे पसरले आहे. अतिशय सुरक्षित प्रवास म्हणून एस.टी.च्या प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र, विनाअपघात सेवा देणारे चालक किती, याचा आढावा घेतला तेव्हा ४६९ चालक विनाअपघात सेवा देण्यात कमी पडल्याची बाब समोर आली. एस.टी. महामंडळाच्या परभणी विभागातून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. या दोन्ही जिल्ह्यांत ८५० चालक कार्यरत आहेत. वर्षभराच्या काळात एकही अपघात न करता वाहन चालविणाऱ्या चालकांना १ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. त्याचप्रमाणे एक वर्षापेक्षा अधिक काळ विनाअपघात सेवा दिल्यास ६०० रुपयांचे बक्षीस दिले जाते. मागील वर्षी परभणी विभागातील ३०४ चालकांना १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले असून, ७७ चालक ६०० रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. या चालकांनी सुरक्षित सेवा देऊन आपले कर्तव्य बजावले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला उर्वरित ४६९ चालक मात्र विनाअपघात सेवा देऊ शकले नाहीत, ही बाब समोर येते. त्यामुळे एस.टी.ची वाहतूक आणखी सुरक्षित करण्यासाठी बस चालकांना आणखी सतर्क राहून सेवा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वर्षभरात झाले ३१ अपघात

जिल्ह्यात मागील वर्षभरात ३१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये १५ किरकोळ, १२ गंभीर स्वरूपाचे आणि ४ अपघातात मृत्यू ओढावलेला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. चारही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. या वर्षभरात मोठा अपघात एकही झाला नाही. मात्र, दुचाकीला धडक देणे, चुकून वाहन एस.टी.च्या समोर येणे, अशा स्वरूपाचे अपघात घडले आहेत. चालकांना महामंडळाच्या वतीने तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एस.टी.चा प्रवास सुरक्षित मानला जातो.

वेगावर नियंत्रण

एस.टी. महामंडळाच्या बस क्षमतेपेक्षा अधिक वेगाने चालविल्या जाऊ नयेत. कमी अंतराच्या वाहनांना ७० कि.मी. प्रति तास, तर लांब पल्ल्यांच्या वाहनांना ८० कि.मी. प्रति तास अशी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी असते.