शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हलकासा पाउस पडताच केरवाडी-सिरपूर रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:33 IST

२० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर साधे गिट्टीचे टीपर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा एखाद्या लोकप्रतिनीधीला घडले ...

२० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर साधे गिट्टीचे टीपर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा एखाद्या लोकप्रतिनीधीला घडले नाही. म्हणून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली. सध्या रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेले नाही. रस्ता मातीच्या थराला लागला. जागोजागी पाणी साचत असून तिथे चिखल तयार होत आहे. तो २-२ दिवस वाळत नाही. तोपर्यंत वाहतूक ठप्प होते. पायी देखील चालता येत नाही. वाहने तर दुरचीच बाब राहिली. तरीही वाहने नेण्याचा प्रयत्न केल्यास ते फसत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. १९ फेब्रुवारी रोजी पालम तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने हा रस्ता बंद झाला. तो शनिवारपर्यंत सुरू होवू शकला नाही. झालेल्या पावसाळ्यात या समस्येला सिरपूरसह सहा गावातीत ग्रामस्थ तोंड देवून वैतागले आहेत. त्यात सिरपूर पलिकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी, रावराजूर, रोकडेवाडी गावचा समावेश आहे. रस्त्यासाठी अनेकवेळा निवेदने, विनंत्या केल्या. तरीही त्याकडे साफ दुर्लक्ष केल्या जाते. परंतु जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीपूर्वी रस्ता डांबरीकरणाचे आश्वासन सर्व उमेदवारांकडून दिल्या जाते. जशाही निवडणुका आटोपल्या की, लोकप्रतिनीधी गावाकडे फिरकतही नाहीत. आगामी पावसाळ्यापुर्वी रस्ता दुरूस्त झाला नसल्यास वाहतुकीसाठी ग्रामस्थांना हिवाळ्याची वाट पाहवी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी हा रस्ता दुरूस्त करवा, त्याचे डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.