शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

रबीच्या तिसऱ्या आवर्तनासाठी जायकवाडीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST

पाथरी:जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी तिसऱ्या आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. १० ...

पाथरी:जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी तिसऱ्या आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. १० फेब्रुवारीपासून पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिकांसाठी १ मार्चपासून चार पाणी पाळीचे नियोजन ही जायकवाडी विभागाकडून करण्यात आले आहे.

पैठण येथील जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरल्या नंतर याचा सिंचनासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो. डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील वरखेड येथून जायकवाडीचे क्षेत्र सुरू होते. पाथरी, मानवत, परभणी भागातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होतो.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी या प्रमुख पिकांसोबत कापूस आणि ऊस पिकांसाठी या पाण्याचा लाभ मिळतो. यावर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी विभागाने तीन पाणी पाळ्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी पाहिले रोटेशन २७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, दुसरे रोटेशन ८ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत चालेल. आता जायकवाडी विभागाने तिसऱ्या रोटेशनसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. कमी क्षमतेने पाणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पूर्णक्षमतेमे पाणी आल्या नंतर १० फेब्रुवारी पासून सिंचनासाठी पाणी वितरीकेतून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जाणार आहे.

६ हजार १०० हेक्टर सिंचन

जायकवाडीच्या डाव्या कलव्यावर रब्बीसाठी ६ हजार १०० हेक्टरवर सिंचन करण्यात आले आहे. जायकवाडीच्या पाण्याने या भागातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी मोठा फायदा झाला आहे.

उन्हाळी हंगामासाठी १ मार्चपासून पाणी सोडण्याचे नियोजन

रब्बी हंगामातील तीन पाणी रोटेशन सोबतच उन्हाळी हंगामातील पिकांना ४ रोटेशन पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ मार्च पासून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता डी. बी. खारकर यांनी दिली.