शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि ...

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टरवरील शेती सिंचनासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी पिकाच्या उत्पादन वाढीस लाभ होणार आहे.

शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने या प्रकल्पास आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध झाला. या निधीतून निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरला. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला असला तरी रबी हंगामातील पिकांमधून उत्पादन घेण्याचा कल शेतकऱ्यांत दिसून येत आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता २ डिसेंबर रोजी डाव्या आणि उजव्या कालव्यातून २१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यातच डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याच्या प्रवाहास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी माजलगाव कालवा क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी वेळीच दक्षात घेऊन कालव्यात काही ठिकाणी साचलेला गाळ व वाढलेली झाडे, झुडपी बाजूला केली. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होत आहे. कालव्याची स्वच्छता करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहून कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंता लांब हे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यावर्षी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील शेती सिंचनास या पाण्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

‘‘यावर्षी लोअर दुधना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. सिंचनासाठी पाणी सोडल्याने हे पाणी दोन्ही कालव्याच्या टेलपर्यंत पोहोचणार आहे. गाळ, झुडपे आम्ही अगोदरच काढून पाण्याचा प्रवाह आडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय होऊ न देता पाण्याचा जपून वापर करून शेती सिंचनासाठी उपयोग घ्यावा.

-प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

१५ डिसेंबरपर्यंत राहणार पाणी

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून २ डिसेंबरपासून २१ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गहू पिकास लाभदायी ठरणार आहे. विशेष म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत या पाण्याचा विसर्ग राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.