शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

२८ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि ...

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टरवरील शेती सिंचनासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी पिकाच्या उत्पादन वाढीस लाभ होणार आहे.

शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने या प्रकल्पास आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध झाला. या निधीतून निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरला. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला असला तरी रबी हंगामातील पिकांमधून उत्पादन घेण्याचा कल शेतकऱ्यांत दिसून येत आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता २ डिसेंबर रोजी डाव्या आणि उजव्या कालव्यातून २१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यातच डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याच्या प्रवाहास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी माजलगाव कालवा क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी वेळीच दक्षात घेऊन कालव्यात काही ठिकाणी साचलेला गाळ व वाढलेली झाडे, झुडपी बाजूला केली. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होत आहे. कालव्याची स्वच्छता करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहून कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंता लांब हे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यावर्षी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील शेती सिंचनास या पाण्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

‘‘यावर्षी लोअर दुधना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. सिंचनासाठी पाणी सोडल्याने हे पाणी दोन्ही कालव्याच्या टेलपर्यंत पोहोचणार आहे. गाळ, झुडपे आम्ही अगोदरच काढून पाण्याचा प्रवाह आडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय होऊ न देता पाण्याचा जपून वापर करून शेती सिंचनासाठी उपयोग घ्यावा.

-प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

१५ डिसेंबरपर्यंत राहणार पाणी

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून २ डिसेंबरपासून २१ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गहू पिकास लाभदायी ठरणार आहे. विशेष म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत या पाण्याचा विसर्ग राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.