शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

२८ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि ...

परभणी : निम्न दुधना या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याचा परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, मानवत व परभणी या तालुक्यांतील डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टरवरील शेती सिंचनासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे रबी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी पिकाच्या उत्पादन वाढीस लाभ होणार आहे.

शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने या प्रकल्पास आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध झाला. या निधीतून निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने निम्न दुधना प्रकल्प तुडुंब भरला. त्यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला असला तरी रबी हंगामातील पिकांमधून उत्पादन घेण्याचा कल शेतकऱ्यांत दिसून येत आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्या सिंचनाकरिता २ डिसेंबर रोजी डाव्या आणि उजव्या कालव्यातून २१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यातच डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याच्या प्रवाहास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी माजलगाव कालवा क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी वेळीच दक्षात घेऊन कालव्यात काही ठिकाणी साचलेला गाळ व वाढलेली झाडे, झुडपी बाजूला केली. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होत आहे. कालव्याची स्वच्छता करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहून कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंता लांब हे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यावर्षी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील २८ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावरील शेती सिंचनास या पाण्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

‘‘यावर्षी लोअर दुधना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. सिंचनासाठी पाणी सोडल्याने हे पाणी दोन्ही कालव्याच्या टेलपर्यंत पोहोचणार आहे. गाळ, झुडपे आम्ही अगोदरच काढून पाण्याचा प्रवाह आडणार नाही, याची दक्षता घेतली आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय होऊ न देता पाण्याचा जपून वापर करून शेती सिंचनासाठी उपयोग घ्यावा.

-प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

१५ डिसेंबरपर्यंत राहणार पाणी

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून २ डिसेंबरपासून २१ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गहू पिकास लाभदायी ठरणार आहे. विशेष म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत या पाण्याचा विसर्ग राहणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.