शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

शाश्वत पाण्यामुळे वाढले सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST

बसपोर्टचे काम निधीअभावी रखडले परभणी : बस स्थानकावरील बसपोर्ट उभारण्याचे काम निधीअभावी रखडले आहे. विशेष म्हणजे, काम सुरू होण्यापूर्वी ...

बसपोर्टचे काम निधीअभावी रखडले

परभणी : बस स्थानकावरील बसपोर्ट उभारण्याचे काम निधीअभावी रखडले आहे. विशेष म्हणजे, काम सुरू होण्यापूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता, परंतु या निधीचा पुरवठा केला जात नाही. एस.टी. महामंडळ प्रशासन निधी उपलब्ध करून देण्यास उदासीन असल्याने, सध्या काम ठप्प पडले आहे.

बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी

परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने चौकाचौकात सिग्नल बसविले होते. सध्या सिग्नल बंद असल्याने केवळ ते शोभेचे झाले आहेत. शहरातील वाढलेली वाहतूक लक्षात घेता, सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

विद्यापीठातील रस्त्यांची दुरवस्था

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या भागातील रस्ते उखडल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. कृषी विद्यापीठाच्या पलीकडील बाजूस अनेक छोट्या गावांतील ग्रामस्थ परभणी शहरात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. ग्रामस्थांसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरील खड्डा बनला धोकादायक

परभणी : खंडोबा बाजार भागातून ता धाररोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध खड्डा पडला असून, हा खड्डा वाहनधारकांसाठी धोक्याचा ठरत आहे. महानगरपालिका प्रशासनाने खड्डा बुजवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन

परभणी : शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. सकाळी दहा वाजेपासून नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असून, बाजारपेठ भागांमध्ये फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रवासी निवाऱ्यांना आली अवकळा

परभणी : शहरातील वसमत रस्त्यावर एसटी महामंडळाने उभारलेल्या प्रवासी निवाऱ्यांना अवकळा आली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याने, प्रवाशांना थांबण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.