शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पुण्या, मुंबईतून जिल्ह्यात वाढला कामगारांचा ओढा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:17 IST

परभणी : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे कामानिमित्त स्थलांतरित झालेले कामगार परत गावाकडे ...

परभणी : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे कामानिमित्त स्थलांतरित झालेले कामगार परत गावाकडे येत आहेत.

जिल्ह्यात आता वाहतुकीसाठी केवळ रेल्वेचाच पर्याय उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रेल्वेस्थानकावर जाऊन पाहणी केली तेव्हा रेल्वेने मोठ्या संख्येने कामगार जिल्ह्यात दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले, मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या शहरात झालेली आबाळ लक्षात घेता, कामगार आतापासूनच उपाययोजना करीत आहेत. गावाकडे परतणाऱ्या कामगारांची संख्या मोठी नसली तरी बहुतांश कामगार रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत आहेत. सचखंड एक्स्प्रेस तसेच पुणे आणि मुंबईकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना मागील काही दिवसांपासून गर्दी दिसून येत आहे. ऊसतोडीसाठी परजिल्ह्यात गेलेले कामगारही ट्रॅक्टरने जिल्ह्यात दाखल होत आहेत.

वसमत, जालना रस्त्यावर गर्दी

परभणी जिल्ह्यातून आणि परप्रांतातून मोठ्या संख्येने कामगार जिल्ह्यात दाखल होत आहेत. वसमत आणि जालना मार्गावर सर्वाधिक गर्दी असल्याचे दिसून येत आहे. दररोज किमान १०० ते १५० कामगार जिल्ह्यात दाखल होत आहेत.

सध्या जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ रेल्वेची सुविधाच सुरू आहे. त्यामुळे पुणे, मुंबई या भागांतून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवासी संख्या वाढली आहे. अनेक जण गावाचा रस्ता धरत आहेत.

मागील वर्षीही कामगार मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर हे कामगार परत कामाच्या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कामगारांचा ओढा कमी असला तरी दररोज रेल्वेने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे.