शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

अनलॉक हाेताच मोबाइल चोरीसह लुटीच्या घटना शहरात वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST

परभणी शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात लॉकडाऊनपूर्वी मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक ...

परभणी शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात लॉकडाऊनपूर्वी मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक महिन्यात मोबाइल चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. चोरी गेलेल्या मोबाइलचा तपास मात्र संथगतीने होत आहे.

मध्यंतरी लॉकडाऊनमुळे या घटना कमी झाल्या होत्या. मात्र जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा मोबाइल चोरीसह इतर लुटीच्या घटना वाढल्या आहेत.

मागील आठवड्यात बसस्थानक परिसरात मारहाण करून एका प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे याच भागात मागील वर्षीदेखील मोबाइल चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत. अनलॉकनंतर या प्रकारांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

तक्रारींची एकत्रित माहितीच उपलब्ध नाही

परभणी शहरात लॉकडाऊन काळात मोबाइल चोरीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी या चोरीच्या प्रकरणांची एकत्रित माहिती पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आतापर्यंत किती मोबाइल चोरीला गेले आणि किती मोबाइल तक्रारकर्त्यांना परत केले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

जिंतूर प्रकरणात परत केले मोबाइल

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जिंतूर येथे मोबाइल शॉपी फोडण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील सुमारे ७० ते ८० मोबाइल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते.

५० टक्के मोबाइलचा तपास लागतच नाही

परभणी शहरात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक महिन्यात मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद केल्या जातात. मात्र यात तपास पूर्ण होऊन संबंधिताला मोबाइल परत करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये अनेक वेळा तक्रारकर्त्यांकडे त्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक नसतो. तसेच मोबाइल खरेदी केल्याची पावतीही नसते. त्यामुळे अनेक प्रकरणात मोबाइल चोरीचा तपास करताना पोलिसांसमोर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

मोबाइल चोरी प्रकरणांत होते दुर्लक्ष

शहरासह जिल्ह्यात मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होते. मात्र बहुतांश वेळा मोबाइलची किंमत कमी असते. त्यामुळे या चोरी प्रकरणाचा तपासही संथगतीने होतो. आरोपीने त्या मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकले तरच तो ट्रेस होतो. त्यामुळे मोबाइल चोरीच्या तक्रारी तर दाखल होतात. मात्र त्याचा तपास लागण्याचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंतच आहे. त्यामुळे मोबाइल चोरीची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक आहे.