शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

अनलॉक हाेताच मोबाइल चोरीसह लुटीच्या घटना शहरात वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST

परभणी शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात लॉकडाऊनपूर्वी मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक ...

परभणी शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात लॉकडाऊनपूर्वी मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक महिन्यात मोबाइल चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. चोरी गेलेल्या मोबाइलचा तपास मात्र संथगतीने होत आहे.

मध्यंतरी लॉकडाऊनमुळे या घटना कमी झाल्या होत्या. मात्र जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा मोबाइल चोरीसह इतर लुटीच्या घटना वाढल्या आहेत.

मागील आठवड्यात बसस्थानक परिसरात मारहाण करून एका प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे याच भागात मागील वर्षीदेखील मोबाइल चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत. अनलॉकनंतर या प्रकारांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

तक्रारींची एकत्रित माहितीच उपलब्ध नाही

परभणी शहरात लॉकडाऊन काळात मोबाइल चोरीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी या चोरीच्या प्रकरणांची एकत्रित माहिती पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आतापर्यंत किती मोबाइल चोरीला गेले आणि किती मोबाइल तक्रारकर्त्यांना परत केले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

जिंतूर प्रकरणात परत केले मोबाइल

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जिंतूर येथे मोबाइल शॉपी फोडण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील सुमारे ७० ते ८० मोबाइल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते.

५० टक्के मोबाइलचा तपास लागतच नाही

परभणी शहरात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक महिन्यात मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद केल्या जातात. मात्र यात तपास पूर्ण होऊन संबंधिताला मोबाइल परत करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये अनेक वेळा तक्रारकर्त्यांकडे त्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक नसतो. तसेच मोबाइल खरेदी केल्याची पावतीही नसते. त्यामुळे अनेक प्रकरणात मोबाइल चोरीचा तपास करताना पोलिसांसमोर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

मोबाइल चोरी प्रकरणांत होते दुर्लक्ष

शहरासह जिल्ह्यात मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होते. मात्र बहुतांश वेळा मोबाइलची किंमत कमी असते. त्यामुळे या चोरी प्रकरणाचा तपासही संथगतीने होतो. आरोपीने त्या मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकले तरच तो ट्रेस होतो. त्यामुळे मोबाइल चोरीच्या तक्रारी तर दाखल होतात. मात्र त्याचा तपास लागण्याचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंतच आहे. त्यामुळे मोबाइल चोरीची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक आहे.