शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST

परभणी : दहावीचा निकाल लागून आता बराच कालावधी लोटला असला, तरी या निकालातून मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल आहे. परीक्षा ...

परभणी : दहावीचा निकाल लागून आता बराच कालावधी लोटला असला, तरी या निकालातून मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल आहे. परीक्षा झाल्या असत्या तर अधिक गुण मिळाले असते, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत.

परीक्षेची चांगली तयारी करूनही अपेक्षित गुण मिळाले नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी विद्यार्थ्यांची समज कशी काढणार? असा प्रश्न आहे.

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा जास्त गुण कसे?

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींच्या गुणांची पडताळणी केली.

या पडताळणीत मी हुशार असताना मला कमी गुण आणि माझ्या मित्राला अधिक गुण कसे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दहावी इयत्तेसाठी निवडलेल्या मूल्यांकन पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत वापरलेली मूल्यांकन पद्धत योग्यच आहे. अनेक विद्यार्थी नववीला जास्त अभ्यास करीत नाहीत. त्यांचे मात्र नक्कीच नुकसान झाले आहे. तसेच जे विद्यार्थी खूप काही ध्येय ठेवून होते, त्यांची मात्र निराशा झाली आहे.

- दिलीप बिनगे, पालक

प्रस्तुत परिस्थितीत पर्याय उपलब्ध नसल्याने वापरलेली मूल्यांकन पद्धत योग्यच आहे. गुणपत्रिका बघताना गुणांची ढगफुटी झाली आहे, हे लक्षात येते. माझ्या निरीक्षणानुसार खरी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान नाही तर लाभच झाला आहे.- कल्याण देशमुख, पालक

परीक्षा घेतली असती तर नक्कीच चांगले गुण मिळाले असते. काही विद्यार्थ्यांना अपेक्षापेक्षा जास्त गुण मिळाले, तर काहींना कमी. बऱ्याच वेळा नववीला जास्त तयारी नसते; पण दहावीच्या परीक्षेसाठी बरीच तयारी केलेली असते. त्यामुळे परीक्षा व्हायला पाहिजे होत्या. - हर्षदा कच्छवे

लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणातही आम्ही मनापासून अभ्यास केला; पण परीक्षाच झाली नाही. जर परीक्षा झाली असती तर आता जे मला गुण मिळाले आहेत, त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असते. त्यामुळे परीक्षा व्हायलाच पाहिजे होती, असे मला वाटते.

- अनुष्का सुरेश हिवाळे