शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

बँकेतील पैसा सांभाळा, अनोळखी लिंकच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. यातच डिजीटल जमान्यात मोबाईलमध्ये बँकेचे सर्व व्यवहार करण्यासाठीचे अँप्लिकेशन उपलब्ध आहेत. यामुळे बँकेत जाण्याचे ...

सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. यातच डिजीटल जमान्यात मोबाईलमध्ये बँकेचे सर्व व्यवहार करण्यासाठीचे अँप्लिकेशन उपलब्ध आहेत. यामुळे बँकेत जाण्याचे काम फार क्वचितच उरले आहे. मात्र, यातही बँकेच्या नावाखाली खोटे एसएमएस तयार करुन त्याद्वारे एकाद्याची सर्व माहिती गोळा करुन ऑनलाईन फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. याचे प्रमाण जिल्ह्यातही आहे. मात्र, तक्रार अर्ज देऊन नागरिक मोकळे होतात. यात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे गुन्हेगार नवनवीन पर्याय शोधून फसवणूक करीत आहेत.

अशी होऊ शकते फसवणूक

एटीएम कार्ड ब्लाँकच्या नावाखाली फसवणूक

- एटीएम कार्ड ब्लाँक झाले आहे, नवीन पाहिजे असल्यास किंवा हे कार्ड बंद करण्यासाठी आलेल्या लिंकमध्ये माहिती भरा असे सांगून सध्या फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

क्रेडिट कार्डची रक्कम वाढली

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असो किंवा नसो आणि तुम्ही त्यासाठी अर्ज केलेला नसेल तरीही तुमची क्रेडीट कार्डची रक्कम अमूक हजारांनी वाढली आहे. यासाठी लिंकमध्ये माहिती भरा, असा आलेला एसएमएस तुमचे बँक खाते रिकामे करु शकतो.

केवायसीच्या नावाखाली फसवणूक

बँकेत असलेले खाते केवायसी करणे बाकी आहे. यासाठी आधार कार्ड, पँन कार्ड यांची माहिती भरा असे सांगून बँक खात्याला जोडलेल्या नंबरवरील आलेला ओटीपी द्या, असा फसवणूकीचा प्रकार सध्या सर्वाधिक प्रमाणात होत आहे. यातून केवायसीच्या नावाखाली रक्कम काढून घेतली जात आहे.

अनोळखी अँप्लिकेशन इन्स्टाँल करणे टाळा

आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही अँप्लिकेशन घेताना अँलो अँप्लिकेशन करताना मोबाईलमधील वैयक्तिक माहिती फसवणूक करणाऱ्याच्या हाती पडू शकते. यातून तुमच्या मोबाईलवर बँकेत पैसे जमा करण्यासाठी यावर क्लिक करा, अशा लिंकपासून धोका होऊ शकतो. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

४८ तासात तक्रार करणे गरजेचे

ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झालेले पैसे परत मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्याच्या बँकेत किंवा आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर याची तक्रार करता येते. तसेच पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करता येतो. यासाठी फसवणूक झाल्यानंतर ४८ तासात तक्रार करणे गरजेचे आहे. यानंतर मात्र, पैसे मिळणे अवघड आहे.

परभणी जिल्ह्यात प्रकार वाढले

जिल्ह्यात केवायसी तसेच ऑनलाईन फसवणूकीच्या माध्यमातून खात्यातील पैसे गायब करण्याचे प्रकार वाढले आहेत. अगदी २ हजारांपासून ते २ लाखापर्यंत रक्कम चोरीला गेली आहे. मात्र, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.