शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हातगाडे रस्त्यावर; दंड मात्र खरेदीदारास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

शहरातील जिंतूर रोड भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. हा भाग राष्ट्रीय महामार्गाचा असून, या रस्त्याच्या कडेला जांब नाका ते ...

शहरातील जिंतूर रोड भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. हा भाग राष्ट्रीय महामार्गाचा असून, या रस्त्याच्या कडेला जांब नाका ते महाराणा प्रताप चौकापर्यंत अनेक फळ विक्रेते आणि हातगाडेचालकांनी व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ग्राहक रस्त्याच्या कडेला उभे राहून याठिकाणी खरेदी करतात. वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी जिंतूर रोड भागात फळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरून दंड ठोठावला. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाडेचालक आणि विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अतिक्रमणाचा पादचारी, वाहनचालकांना त्रास

जांब नाका परिसरात अनेक फळ विक्रेते, हॉटेलचालक, छोट्या-मोठ्या दुकानदारांनी कच्चे व पक्के अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या परिसरात दररोज छोटे-मोठे अपघात घडत असल्याने या भागातील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.