शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचानामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST

जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी ...

जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य शासनाला तातडीने सादर करावा, तसेच मागील १५ दिवसांपूर्वी जी अतिवृष्टी झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती मोबाइल ॲपद्वारे रिलायन्स या जिल्ह्यासाठीच्या विमा कंपनीला देण्याचा प्रयत्न केला; परंतु अतिवृष्टीमुळे नेटवर्क जाम असल्याने, तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी एकदाच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केल्याने सदरील कंपनीचे सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविताना अडचणी आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज ऑफलाइन घेण्यात यावेत, तसेच ज्या महसूल मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन पंचनामे करावेत. अतिवृष्टमुळे ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, तसेच जनावरे दगावली आहेत, त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, तसेच रस्त्यांचे नुकसान, विजेचे खांब पडणे याबाबतचाही अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री मलिक यांनी दिले आहेत. मंत्रालयातील बैठकीस आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार विजय भांबळे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिप सीईओ शिवानंद टाकसाळे, कृषी, बांधकाम आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.