शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचानामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST

जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी ...

जिल्ह्याच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य शासनाला तातडीने सादर करावा, तसेच मागील १५ दिवसांपूर्वी जी अतिवृष्टी झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती मोबाइल ॲपद्वारे रिलायन्स या जिल्ह्यासाठीच्या विमा कंपनीला देण्याचा प्रयत्न केला; परंतु अतिवृष्टीमुळे नेटवर्क जाम असल्याने, तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी एकदाच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केल्याने सदरील कंपनीचे सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविताना अडचणी आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज ऑफलाइन घेण्यात यावेत, तसेच ज्या महसूल मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तेथील शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन पंचनामे करावेत. अतिवृष्टमुळे ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, तसेच जनावरे दगावली आहेत, त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, तसेच रस्त्यांचे नुकसान, विजेचे खांब पडणे याबाबतचाही अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री मलिक यांनी दिले आहेत. मंत्रालयातील बैठकीस आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार विजय भांबळे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिप सीईओ शिवानंद टाकसाळे, कृषी, बांधकाम आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.