शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांपासून शासकीय हरभरा खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला असला, तरी रब्बी हंगामातील ...

यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला असला, तरी रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांनी या पाण्याचा उपयोग करत रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी ही पिके घेतली. सध्या या पिकांची काढणी सुरू असून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होत असल्याचे दिसून येत आहे. गंगाखेड तालुक्यातील खाजगी बाजारपेठेत हरभरा पिकाला केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमी दरापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाऊ लागला. त्यामुळे राज्य शासनाने गंगाखेड येथे हमीभाव खरेदी केंद्र उघडले. यासाठी १ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर तालुक्यातील १ हजार ४४२ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांकडे नोंदणी केली. त्यानंतर २३ मार्चपर्यंत ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दराने ३३० शेतकऱ्यांचा ३ हजार १८० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र, मागील १५ दिवसांपासून गोदामाअभावी या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या १ हजार ४४२ शेतकऱ्यांपैकी १ हजार ११२ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने याकडे लक्ष देऊन केवळ गोदामाअभावी बंद असलेले गंगाखेड येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे व प्रतीक्षेत असलेल्या १ हजार ११२ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे

गंगाखेड तालुक्यातील ३३० शेतकऱ्यांनी आपला हरभरा शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केला आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ६०० क्विंटल हरभरा विक्री करणाऱ्या १२४ शेतकऱ्यांच्या खात्यावर शासकीय हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून ८१ लाख ६० हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, अजूनही २०४ शेतकऱ्यांचे देणे शासकीय हमीभाव खरेदी केंद्राकडे बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे देणे तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.