शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:18 IST

या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या तिजोरीत महसुलाची भर६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी : जिल्ह्यासाठी वरदान लाभलेल्या येलदरी येथील प्रकल्पातून ७ महिन्यांमध्ये ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती झाली असून, याद्वारे राज्याच्या तिजोरीमध्ये १४ कोटी रुपयांच्या महसूलाची भर या सिंचन प्रकल्पाने घातली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाने परभणीसह हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमधील अनेक शहरे आणि गावांची तहान भागविली आहे. शिवाय लाखो हेक्टर क्षेत्र सिचंनाखाली आले आहे. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे येथील वीज निर्मित प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आला. एप्रिल  महिन्यापासूनच प्रकल्पाची वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी हा प्रकल्प बंद होता; परंतु, १२ ऑगस्ट रोजी येलदरी धरण १००टक्के भरल्याने अतिरिक्त होणारे पाणी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडण्यात आले. लॉकडाऊन आणि कमी मनुष्यबळ असतानाही या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीज निर्मितीचे केलेले काम कौतुकास्पद ठरत आहे. १ एप्रिल ते २२ ऑक्टोबर या ७ महिन्यांच्या काळात ४६.१४ दशलक्ष युनिट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती करण्यात आली असून, राज्याच्या तिजोरीत १४ कोटी रुपयांची भर घातली आहे.

महानिर्मितीचे मुख्य अभियंता ए.एस. कुलकर्णी, नाशिक येथील अधीक्षक अभियंता राजेंद्र कुमावत, कार्यकारी अभियंता बी.एम. डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.के. रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अखंडीतपणे हे केंद्र सुरू ठेवले. त्यामुळे या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची पदे रिक्तयेलदरी येथील जल विद्युत प्रकल्पाने राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा केला असला तरी या प्रकल्पाला कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची एकूण ५६ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २५ कर्मचाऱ्यांवर हा प्रकल्प चालविला जात आहे. विशेष म्हणजे वीज निर्मिती केंद्राची उभारणी होवून ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी बसविलेली यंत्रणा आजही कार्यरत आहे. यंत्रणा जुनी झाल्यानंतर तिची क्रय शक्ती कमी होते. मात्र येथील वीज निर्मिती केंद्राने स्थापित क्षमतेपेक्षा अधिक वीज निर्मिती करून वेगळेपण सिद्ध केले आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखालीयेलदरी प्रकल्पाला मराठवाड्यात अनन्य साधारण महत्व आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीचे सिंचन होणार आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील मोठ्या शहरासह २५० हून अधिक गावांना वर्षभर पाणी पुरवठा येथून होतो. 

टॅग्स :parabhaniपरभणीelectricityवीज