शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडेला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST

नदीवरील पुलाचे काम संथगतीने परभणी : पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील पूर्णा नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मागील ...

नदीवरील पुलाचे काम संथगतीने

परभणी : पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील पूर्णा नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मागील वर्षभरापासून हे काम सुरू आहे. सध्या पुलाचे केवळ पिलर उभे करण्यात आले आहेत. त्यापुढे काम सरकले नाही. विशेष म्हणजे, याच परिसरात जुना पूल असून, या पुलालगत पाणी टेकत आहे. अधिक उंचीचा पूल नसल्याने डिग्रस बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठा करताना अडचणी निर्माण होत आहेत.

जिल्ह्यात वाढले उसाचे क्षेत्र

परभणी : जिल्ह्यात यावर्षी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून, प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असून, या पाण्याच्या भरवश्यावर बागायती पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस पिकालाच प्राधान्य दिल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे क्षेत्र वाढले आहे.

शासकीय कार्यालयातच स्वच्छतेला फाटा

परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरातील शासकीय कार्यालयांमध्येच स्वच्छतेला फाटा देण्यात आला आहे. या इमारतीतील कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. त्याचप्रमाणे पान खाऊन भिंती रंगलेल्या असून, त्याच्या स्वच्छतेकडे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या अंगणातच अस्वच्छता निर्माण झाली आहे.

जिल्हा कचेरीत वाहनांचा गराडा

परभणी: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वाहनांचा गराडा लागत आहे. विशेष म्हणजे नो पार्किंगचा फलक लावलेल्या जागेवरच बिनधास्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताना नागरिकांना वाहनांचा अडथळा दूर करुन प्रवेश मिळवावा लागत आहे.

रेल्वेस्थानकावर वाढली प्रवाशांची गर्दी

परभणी : रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांची संख्या वाढविली असून, आरक्षण करुनच रेल्वेचा प्रवास करता येणार आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांचीही आता गर्दी होऊ लागली आहे. मात्र रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या तापमान तपासणीला खो देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यांच्या कामाला निधीचा अडसर

परभणी : जिल्ह्यात प्रमुख रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने निधीची मागणी नोंदविली असली तरी शासनाने निधी पुरवठा केला नाही. त्यामुळे सध्या तरी रस्ता विकासाची कामे ठप्प असून, वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे.