शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

गंगाखेड रस्त्याच्या कामाने घेतला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

बाजारपेठ भागात गर्दी कायम परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बाजारपेठेतील गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यामुळे फिजिकल ...

बाजारपेठ भागात गर्दी कायम

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बाजारपेठेतील गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. मनपा प्रशासन मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत असले तरी फिजिकल डिस्टन्स संदर्भात मात्र कारवाई होताना दिसत नाही.

वसमत रोडवरील वाहतूक धोकादायकच

परभणी : वसमत रस्त्यावर असोला पाटी ते झिरो फाटा या दरम्यानची वाहतूक धोकादायक बनत आहे. या मार्गावर रस्ता निर्मितीचे काम सुरू असून, एका बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक याच अरुंद रस्त्यावरून केली जात आहे. शिवाय उखडलेल्या गिट्टीमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

स्टेडियम समोरील ढापा गायब

परभणी : येथील जिल्हा स्टेडियमच्या प्रवेशद्वार समोरच नालीवरील ढापा गायब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. अनेक वेळा खड्डा लक्षात न आल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने ढापा बसवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत

परभणी : शहरात अजूनही पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरळीत झाले नाही. नागरिकांना आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता किमान चार दिवसाआड पाणी देण्यात नियोजन मनपाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

गुटख्याची खुलेआम विक्री

परभणी : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची जिल्ह्यात खुलेआम विक्री होत आहे. मध्यंतरी पोलीस प्रशासनाने अवैध गुटखा विक्रीविरुद्ध कारवाई सुरू केल्याने या विक्रीला काहीसा आळा बसला होता. मात्र ही मोहीम बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा विक्री सुरू वाढली आहे. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

वाळू अभावी बांधकाम व्यवसाय अडचणीत

परभणी : जिल्ह्यात वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत चढ्या दराने वाळूची विक्री होत असल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. हा व्यवसाय जवळपास ठप्प झाला असून, मुजरांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे.

स्थानकावर कोरोना चाचण्यांना फाटा

परभणी : जिल्ह्यातील एकाही बसस्थानकावर प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र महामंडळ प्रशासनाने अद्याप या चाचण्या करण्याची सुविधा निर्माण केली नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे नागरिक विनाचाचणी शहरात प्रवेश करीत आहे.