शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

१५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रा.पं. खात्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST

१ सप्टेंबर २०२० ला तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या खात्यावर १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला ...

१ सप्टेंबर २०२० ला तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या खात्यावर १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये एवढ्याच रकमेचा दुसरा हप्ता ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. या निधीतून ग्रामपंचायतीच्या वतीने बंदिस्त व इतर कामांची आखणी करण्यात आली. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सरपंच १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी उत्साही होते;मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने डिजिटल सॉफ्टवेअरच्या अंतर्गतच या विकासकामांचे देयक काढण्यात येतील असे आदेश बजावले. १५ व्या वित्त आयोगांतर्गत देयके अदा करण्याचे काम पंचायत समिती ऐवजी पीएफएमएस सिस्टीमला देण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसल्याचे चित्र आहे. पूर्वी ग्रामपंचायतीला वर्ग झालेला निधी खर्च करण्यासाठी सोपी पद्धत अवलंबिली जात असे मात्र राज्य शासनाने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याने निधी खर्च करण्यासाठी अडचणी येत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम असून अडचण नसून खोळंबा असल्याचे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सांगत आहेत. यामुळेच देयक अदा करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे मागील ७ महिन्यांपासून तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतीच्या खात्यावर १५ व्या वित्त आयोगाचा निधी पडून असल्याचे चित्र आहे.परिणामी ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प आहेत.

देयकासाठी बघावी लागते वाट

तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीने डीएसी प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे १५ ते १७ ग्रामपंचायतीला विकास कामावर निधी खर्च करण्यासाठी वर्कऑर्डर मिळाली आहे. यामध्ये भोसा, गोगलगाव,पारडी टाकळी, शेवडी जहागीर, बोन्दरवाडी, नागरजवळा, देवलगाव, हटकरवाडी, ईरळद, पाळोदी, आंबेगाव रामेटाकळी, मानोली या ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतीचा समावेश आहे; मात्र विकास कामावर निधी खर्च केल्यानंतर देयकासाठी पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

असे आहेत निकष

शासनाचे ५० टक्के व अबंधित ५० टक्के बंधीत असे खर्च करावयाचे निकष आहेत. मात्र चालू वर्षात केंद्र सरकारने हे निकष बदलून ६० टक्के अबंधित व ४० टक्के बंधित असे नवीन निर्देश दिल्याने विकास निधीतून काम करु पाहणारे सरपंच चांगलेच गोंधळून गेले आहेत. १४ व्या वित्त आयोगात सर्व निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करून विकासकामे झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर देयके अदा करण्यात येत होते.