शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
2
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
3
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
4
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
5
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
6
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
7
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
8
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
9
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
10
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
11
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
12
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
13
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
14
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
15
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
16
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
17
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
18
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
19
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
20
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!

१५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रा.पं. खात्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST

१ सप्टेंबर २०२० ला तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या खात्यावर १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला ...

१ सप्टेंबर २०२० ला तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या खात्यावर १ कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये एवढ्याच रकमेचा दुसरा हप्ता ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. या निधीतून ग्रामपंचायतीच्या वतीने बंदिस्त व इतर कामांची आखणी करण्यात आली. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सरपंच १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी उत्साही होते;मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने डिजिटल सॉफ्टवेअरच्या अंतर्गतच या विकासकामांचे देयक काढण्यात येतील असे आदेश बजावले. १५ व्या वित्त आयोगांतर्गत देयके अदा करण्याचे काम पंचायत समिती ऐवजी पीएफएमएस सिस्टीमला देण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना खीळ बसल्याचे चित्र आहे. पूर्वी ग्रामपंचायतीला वर्ग झालेला निधी खर्च करण्यासाठी सोपी पद्धत अवलंबिली जात असे मात्र राज्य शासनाने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याने निधी खर्च करण्यासाठी अडचणी येत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम असून अडचण नसून खोळंबा असल्याचे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सांगत आहेत. यामुळेच देयक अदा करण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे मागील ७ महिन्यांपासून तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतीच्या खात्यावर १५ व्या वित्त आयोगाचा निधी पडून असल्याचे चित्र आहे.परिणामी ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प आहेत.

देयकासाठी बघावी लागते वाट

तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीने डीएसी प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे १५ ते १७ ग्रामपंचायतीला विकास कामावर निधी खर्च करण्यासाठी वर्कऑर्डर मिळाली आहे. यामध्ये भोसा, गोगलगाव,पारडी टाकळी, शेवडी जहागीर, बोन्दरवाडी, नागरजवळा, देवलगाव, हटकरवाडी, ईरळद, पाळोदी, आंबेगाव रामेटाकळी, मानोली या ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतीचा समावेश आहे; मात्र विकास कामावर निधी खर्च केल्यानंतर देयकासाठी पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम या सॉफ्टवेअरमध्ये किचकट प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याचे चित्र आहे.

असे आहेत निकष

शासनाचे ५० टक्के व अबंधित ५० टक्के बंधीत असे खर्च करावयाचे निकष आहेत. मात्र चालू वर्षात केंद्र सरकारने हे निकष बदलून ६० टक्के अबंधित व ४० टक्के बंधित असे नवीन निर्देश दिल्याने विकास निधीतून काम करु पाहणारे सरपंच चांगलेच गोंधळून गेले आहेत. १४ व्या वित्त आयोगात सर्व निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करून विकासकामे झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर देयके अदा करण्यात येत होते.