शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

परराज्यातील वाळूला लागणार १० टक्के रॉयल्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:32 IST

परभणी : परराज्यातून जिल्ह्यात वाळू विक्री करण्यासाठी आणण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे १० टक्के स्वामित्व धन भरणे आवश्यक आहे. हे स्वामित्व ...

परभणी : परराज्यातून जिल्ह्यात वाळू विक्री करण्यासाठी आणण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे १० टक्के स्वामित्व धन भरणे आवश्यक आहे. हे स्वामित्व धन भरल्यासच संबंधितांना झिरो पास दिला जाणार असून, त्यायोगे जिल्ह्यात ही वाळू विक्री करता येणार आहे.

जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने परराज्यांतून मोठ्या प्रमाणात वाळू विक्रीसाठी आणली जात आहे. गुजरातच्या वाळूला जिल्ह्यात मोठी मागणी असून, अनेकजण ही वाळू आणून त्याचा साठा करून ठेवतात. त्यानंतर गरजेनुसार वाळूची विक्री केली जाते. मात्र, आतापर्यंत या वाळूसंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे परराज्यांतून किती वाळूचा साठा येत आहे, ही वाळू परवाना घेऊन आली आहे का? याबाबतची माहिती उपलब्ध होत नव्हती. परिणामी जिल्ह्यासह परराज्यांतूनही मोठ्या प्रमाणात वाळू विक्री केली जात होती. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्धारित केलेले १० टक्के प्रति ब्रास याप्रमाणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वर्षभरापासून वाळूची विक्री

जिल्ह्यात मागच्या एक वर्षापासून गुजरातची वाळू विक्री होत आहे. विशेष म्हणजे सहा ते सहा ब्रासचा एक ट्रक या प्रमाणे ही वाळू जिल्ह्यात आणली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून या वाळूचा साठा करून विक्री होत आहे. या वाळूला नागरिकांकडून मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाळूची आवक होत आहे.

काय आहे प्रशासनाचा आदेश

उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. त्यानुसार परराज्यांतून आणलेली वाळूची वाहतूक करण्यासाठी संबंधित संस्था, व्यक्तीस महाराष्ट्र राज्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीसाठीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच व्यापारी परवाना घेणे आवश्यक आहे. परराज्यांतून रस्त्याने, जलमार्गाने आणलेली वाळू ज्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करणार आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि परराज्यातून रेल्वेने आणलेल्या वाळूसाठी ज्या रेल्वेस्थानकावर वाळू उतरविली जाणार आहे, त्या जिल्ह्यात संबंधिताने वेळोवेळी निर्धारित केलेल्या स्वामित्व धनाच्या १० टक्के एवढी रक्कम प्रति ब्रास जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे बंधनकारक राहील. या रकमेचा भरणा केल्यानंतर संबंधितांना झिरो रॉयल्टी पास देण्याची कार्यवाही केली जाईल. त्याचप्रमाणे संबंधित ज्या जमिनीवर परराज्यातून आणलेला वाळूचा साठा करणार असतील ती जमीन अकृषक असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती, संस्था यांचा वाळूसाठा व विक्रीची दैनंदिन नोंद साठा नोंदवहीत घेणे आवश्यक असून, या नोंदवहीची क्षेत्रीय कार्यालयाकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. वैध परवान्यापेक्षा जास्तीचा वाळू साठा आढळल्यास अथवा झिरो रॉयल्टी पासेसशिवाय वाहतूक केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.