शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वडिलांनी स्मार्ट फोनचा हट्ट पुरवला नाही; युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 14:25 IST

या प्रकरणी वडिलांच्या जवाबानंतर ६ मे रोजी आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.

ठळक मुद्देअल्पभूधारक शेतकरी असून शेत जमिनीवरच कुटुंबिय उदरनिर्वाह करतात.

देवगावफाटा : वडिल मोबाईल घेऊन देत नसल्याचा राग मनात धरुन एका युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना सेलू तालुक्यातील निरवाडी खु. तांडा येथील २७ एप्रिल घडली होती. या प्रकरणी वडिलांच्या जवाबानंतर ६ मे रोजी आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.

निरवाडी खु. तांडा येथील कृष्णा गोविंदराव आडे (२०) या युवकाने २७ एप्रिल रोजी चिकलठाणा खु. येथील सखाराम टाके यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. निरवाडी खु. तांडा येथील गोविंदराव आडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेत जमिनीवरच कुटुंबिय उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. 

मुलीचे लग्न करुन दिल्याने गोविंदराव आडे यांची आर्थिक अडचण सुरु होती. त्यांना शेतीकामात मदत करणारा मुलगा कृष्णा आडे याने आत्महत्या केल्यापासून तर या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ६ मे रोजी वालूर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव चौरे यांनी कृष्णा याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबातील सदस्यांचे जवाब नोंदवून घेतले. यावेळी त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी सांगितले, अ‍ॅन्ड्रॉँईड मोबाईल घेऊन देण्याची मागणी कृष्णाने वारंवार केली होती. परिस्थितीमुळे त्याला मोबाईल घेऊन देणे शक्य नसल्याने थोडेसे थांबण्याची विनंती केली. मात्र कृष्णाचा हट्ट जीवावर बेतेल, असे वाटले नव्हते. मोबाईल न दिल्याचा राग मनात धरुन कृष्णाने आत्महत्येचा पर्याय निवडला, असा जवाब त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी पोलिसांना दिला आहे.आई- वडिल हे मुलांच्या सुखासाठी सर्वकाही करीत असतात. मात्र मुलांच्या मनाविरुद्ध पालकांनी वागू नये, असा आजचा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे मुलांचे अनावश्यक हट्ट असतील तर पालकांनी याबाबत अगोदरच मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. जेणेकरुन  मुलाने हा हट्ट सोडून दिला पाहिजे.- साहेबराव चौरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 

टॅग्स :Suicideआत्महत्याMobileमोबाइलparabhaniपरभणी