शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

पालममध्ये तहसील कार्यालयात धडकले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

; तहसीलदारांना निवेदन पालम: तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तुरीचे पीक जागेवरच जळून गेले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, या मागणीसाठी ७ ...

; तहसीलदारांना निवेदन

पालम: तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तुरीचे पीक जागेवरच जळून गेले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, या मागणीसाठी ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील जवळपास ३०० शेतकऱ्यांनी तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले असून हेक्टरी ६० हजार रुपये मदतीची मागणी केली आहे.

पालम तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने कापूस व सोयाबीन पिकाची नासाडी होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मदार तूर पिकावर होती . पण या पिकाला पाण्याचा तडाखा बसला असून जागेवरच पीक वाळून गेले आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना तूर पिकाचा विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे, उपसभापती अण्णासाहेब किरडे, डॉ. रामराव उंदरे, नागनाथआप्पा खेडकर, मारूती शिंदे, तुकाराम पाटील, प्रल्हाद कऱ्हाळे, मोतीराम खंडागळे, नागोराव कऱ्हाळे, तुकाराम कऱ्हाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो: पालम तालुक्यातील तूर पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी गणेशराव रोकडे, अण्णासाहेब किरडे, डाॅ.रामराव उंदरे, नागनाथ आप्पा खेडकर आदी.