शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने ...

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत हरभरा, गहू पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. नदी, नाले व शेतकऱ्यांकडील जलस्त्रोतांना उपलब्ध असलेल्या पाण्यातून सिंचन करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून एका आठवड्यात दिवसा व दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येतो. त्यातही अनेक वेळा तांत्रिक बिघाडच्या नावाखाली वारंवार वीज खंडीत केली जाते. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना वाढता गारवा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेवून रात्री-अपरात्री रबी हंगामातील हरभरा व गहू या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अनेक वेळा जिल्हा प्रशासन व महावितरण कंपनीकडे शेतकऱ्यांनी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे वीज वितरण कंपनीच्या वतीने दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यातील ९२ हजार कृषीपंप धारकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.