शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने ...

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत हरभरा, गहू पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. नदी, नाले व शेतकऱ्यांकडील जलस्त्रोतांना उपलब्ध असलेल्या पाण्यातून सिंचन करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून एका आठवड्यात दिवसा व दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येतो. त्यातही अनेक वेळा तांत्रिक बिघाडच्या नावाखाली वारंवार वीज खंडीत केली जाते. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना वाढता गारवा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेवून रात्री-अपरात्री रबी हंगामातील हरभरा व गहू या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अनेक वेळा जिल्हा प्रशासन व महावितरण कंपनीकडे शेतकऱ्यांनी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे वीज वितरण कंपनीच्या वतीने दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यातील ९२ हजार कृषीपंप धारकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.