शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने ...

येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील जवळपास ९२ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपांना अधिकृत वीज जोडणी घेतलेली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत हरभरा, गहू पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. नदी, नाले व शेतकऱ्यांकडील जलस्त्रोतांना उपलब्ध असलेल्या पाण्यातून सिंचन करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून एका आठवड्यात दिवसा व दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येतो. त्यातही अनेक वेळा तांत्रिक बिघाडच्या नावाखाली वारंवार वीज खंडीत केली जाते. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना वाढता गारवा आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेवून रात्री-अपरात्री रबी हंगामातील हरभरा व गहू या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अनेक वेळा जिल्हा प्रशासन व महावितरण कंपनीकडे शेतकऱ्यांनी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे वीज वितरण कंपनीच्या वतीने दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यातील ९२ हजार कृषीपंप धारकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.