शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घटलेल्या दराने शेतकऱ्यांच्या अपेक्षांची झाली राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST

परभणी : शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी दाखल होताच दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभरापूर्वी ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असणारा ...

परभणी : शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी दाखल होताच दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभरापूर्वी ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असणारा सोयाबीनचा भाव एकदम ६ हजार रुपयांनी खाली आला आहे. त्यामुळे घटलेल्या दराने परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांच्या अपेक्षांची एक प्रकारे राखरांगोळीच झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरापासून सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत सोयाबीनचा भाव ११ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे जिल्ह्यात पेरणी झालेल्या २ लाख २४ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांनी अनेक अपेक्षा बाळगत पिकांवर भला मोठा खर्च केला. दरवर्षीपेक्षा या वर्षी परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातही शेतकऱ्यांनी मोठी वाढ केली आहे. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सध्या बहरात आहे. तर काही ठिकाणी पिकाची काढणी झाली असून, ते बाजारात विक्रीसाठी येत आहे. ११ हजार रुपयांचा भाव मिळेल, या अपेक्षेने बाजारात आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.

उत्पादकांच्या हिताकडे कोण लक्ष देणार?

शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारात येताच प्रति क्विंटल ६ हजार रुपयांनी भाव घसरले. गतवर्षीही शेतकऱ्यांकडून ३ ते ४ हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी करून तेच सोयाबीन व्यापाऱ्यांनी ८ ते १० हजार रुपयांनी विक्री केले. त्यामुळे उत्पादकांचा फायदा होण्याऐवजी मध्यस्थींचा गतवर्षी फायदा झाला. त्यामुळे या वर्षीही ११ हजारांवर गेलेले सोयाबीन ५ हजार रुपयांनी खरेदी होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तेलाचे भाव मात्र जैसे थे

एकीकडे तेलाच्या भावात घसरण व डीओसीची मागणी घटल्याने सोयाबीनचे भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आज बाजारपेठेत प्रतिकिलो तेलाचा भाव १६४ रुपये जैसे थेच आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव पाडण्यासाठी देण्यात येणारे कारणही तकलादूच आहेत. त्यामुळे तेलाचे भाव जैसे थे असतानाच सोयाबीनचे भाव का काढले जात आहेत, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

तेलाच्या भावात झालेली घसरण व डीओसीची मागणी घटली असून, सोयाबीनमध्ये आर्द्रताही १८ ते २२ टक्क्यापर्यंत येत आहे. त्यामुळे सोयाबीन दरात घसरण झाली आहे. मात्र, गुरुवारी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलची खरेदी-विक्री झाली.

- मोतीशेठ जैन, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच भाव पाडण्यात आले. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या कारणांमुळे भाव पाडले जात आहेत, त्याचा सोयाबीन खरेदी-विक्रीशी कोणताच संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे.

- माणिक कदम, शेतकरी