शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

घटलेल्या दराने शेतकऱ्यांच्या अपेक्षांची झाली राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST

परभणी : शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी दाखल होताच दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभरापूर्वी ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असणारा ...

परभणी : शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी दाखल होताच दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभरापूर्वी ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असणारा सोयाबीनचा भाव एकदम ६ हजार रुपयांनी खाली आला आहे. त्यामुळे घटलेल्या दराने परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांच्या अपेक्षांची एक प्रकारे राखरांगोळीच झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरापासून सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत सोयाबीनचा भाव ११ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे जिल्ह्यात पेरणी झालेल्या २ लाख २४ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांनी अनेक अपेक्षा बाळगत पिकांवर भला मोठा खर्च केला. दरवर्षीपेक्षा या वर्षी परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातही शेतकऱ्यांनी मोठी वाढ केली आहे. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सध्या बहरात आहे. तर काही ठिकाणी पिकाची काढणी झाली असून, ते बाजारात विक्रीसाठी येत आहे. ११ हजार रुपयांचा भाव मिळेल, या अपेक्षेने बाजारात आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.

उत्पादकांच्या हिताकडे कोण लक्ष देणार?

शेतकऱ्याचे सोयाबीन बाजारात येताच प्रति क्विंटल ६ हजार रुपयांनी भाव घसरले. गतवर्षीही शेतकऱ्यांकडून ३ ते ४ हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी करून तेच सोयाबीन व्यापाऱ्यांनी ८ ते १० हजार रुपयांनी विक्री केले. त्यामुळे उत्पादकांचा फायदा होण्याऐवजी मध्यस्थींचा गतवर्षी फायदा झाला. त्यामुळे या वर्षीही ११ हजारांवर गेलेले सोयाबीन ५ हजार रुपयांनी खरेदी होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तेलाचे भाव मात्र जैसे थे

एकीकडे तेलाच्या भावात घसरण व डीओसीची मागणी घटल्याने सोयाबीनचे भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आज बाजारपेठेत प्रतिकिलो तेलाचा भाव १६४ रुपये जैसे थेच आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव पाडण्यासाठी देण्यात येणारे कारणही तकलादूच आहेत. त्यामुळे तेलाचे भाव जैसे थे असतानाच सोयाबीनचे भाव का काढले जात आहेत, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

तेलाच्या भावात झालेली घसरण व डीओसीची मागणी घटली असून, सोयाबीनमध्ये आर्द्रताही १८ ते २२ टक्क्यापर्यंत येत आहे. त्यामुळे सोयाबीन दरात घसरण झाली आहे. मात्र, गुरुवारी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलची खरेदी-विक्री झाली.

- मोतीशेठ जैन, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष

शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच भाव पाडण्यात आले. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या कारणांमुळे भाव पाडले जात आहेत, त्याचा सोयाबीन खरेदी-विक्रीशी कोणताच संबंध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे.

- माणिक कदम, शेतकरी