शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळेनात मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST

जिल्ह्यात बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. सद्य:स्थितीत शेतीमध्ये कापसाची काढणी सुरू आहे. याच बरोबर शेतीतील पाण्यावर घेतलेल्या पिकांच्या मशागतीची ...

जिल्ह्यात बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. सद्य:स्थितीत शेतीमध्ये कापसाची काढणी सुरू आहे. याच बरोबर शेतीतील पाण्यावर घेतलेल्या पिकांच्या मशागतीची कामेही वेगाने सुरू आहेत. जायकवाडी, येलदरी व निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी शेतीत याद्वारे पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकरिता शेतीत कामे करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असताना ते मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक मजूर तोडीच्या कामासाठी परगावी गेले आहेत, तर बरेच मजूर पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरांमध्ये कामाच्या शोधात गेले आहेत. त्यामुळे मजुरीच्या दरांमध्ये वाढ करूनही शेतकऱ्यांना मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना यंत्राचा सहारा घेऊन शेतीत कामे करावी लागत आहेत. यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

काय म्हणतात शेतकरी

मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊनदेखील मजूर मिळत नाहीत. त्यामुळे फवारणी, खुरपणी, खत घालणे, अशी मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. मजुरांअभावी स्वत:च्या कुटुंबातील सदस्यच कामावर येत आहेत.

-रमेश तांबे, शेतकरी देवगाव फाटा

गाव परिसरातील अनेक मजूर कामाच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये गेले आहेत. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे यंत्राच्या साहाय्याने कामे करून घ्यावी लागत आहेत. यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे.

-सोपान मोगल, शेतकरी, नागठाणा

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे रबी हंगामावर आशा आहे. असे असताना मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. तरीही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे यंत्राद्वारे काम करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या कामासाठी यंत्रे घेतली आहेत. या माध्यमातून काम करताना शेतकऱ्यांचा एकीकडे वेळ वाचत असला तरी दुसरीकडे यासाठीचा खर्च अधिक लागत आहे. ट्रॅक्टरने नांगरणीसाठी एकरी १२०० रुपये, पाळीसाठी ६०० रुपये, सोयाबीन काढण्यासाठी ४ हजार रुपये द्यावे लागतात.