शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 23, 2014 14:25 IST

अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्‍यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

देवगावफाटा : अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्‍यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले असून, शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

देवगावसह चिकलठाणा मंडळामध्ये शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन पीक घेण्यास पसंती दर्शविली होती. परंतु, सहा नक्षत्र कोरडेठाक गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. मघा आणि पूर्वा नक्षत्रात पावसाच्या हजेरीने खरीप पिकास जीवदान मिळाले होते. खरिपाची सुगी करून बळीराजा दिवाळी दणदणीत साजरा करायचा. 
परंतु, यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले. परिणामी दिवाळी झगमगाटात साजरी होत असली तरी शेतकर्‍यांच्या हृदयात मात्र अंधकाराची हुडहुडी भरली आहे. सोयाबीनच्या एका बॅगचा बियाणाचा खर्च २ हजार ७00 रुपये, खतासाठी १ हजार रुपये, फवारणी व मजुरीसाठी ८00 रुपये तर काढणीसाठी १५00 रुपये असा ६ हजार रुपये खर्च आला असून, एका बॅगला उत्पन्न मात्र १00 किलो निघत आहे. 
सोयाबीनला प्रतिक्विंटल २९00 ते ३000 रुपये भाव मिळत असल्याने खर्च निघणे अवघडझाले आहे. एक प्रकारे दिवाळीच्या आनंदावर विरजन पडल्याचे दिसते. काही शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीनचे पीक वाया जावू नये म्हणून सिंचनाची सोय केली. परंतु, भारनियमनामुळे त्यालाही फटका बसला. 
परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे ज्वारी, हरभरा यांची पेर धोक्यात आली आहे. एकंदरीत शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर) 
■ खरिपाची पेर वाया गेली. तर रबीची पेरच धोक्यात आली. सोयाबीनची परिस्थिती पाहता अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या पिकात जनावरे सोडली. अशी विदारक परिस्थिती असतानाही अधिकारी मात्र सरकारला या संदर्भात अंधारात ठेवीत आहेत. महसूल विभागाने वस्तुनिष्ठ आणेवारी काढावी व शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी सूर्यकांत होणराव व नागनाथ साळेगावकर यांनी केली आहे. आर्थिक मदत जाहीर करावी
> खरिपाची पेरणी वाया गेल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखलघेऊन सोयाबीनच्याभावात वाढ करावी, व नुकसानीबद्दल आर्थिक मदत जाहीर करून बळीराजास दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी रमेश तांबे यांनी केली.