शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 23, 2014 14:25 IST

अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्‍यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

देवगावफाटा : अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्‍यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले असून, शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

देवगावसह चिकलठाणा मंडळामध्ये शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन पीक घेण्यास पसंती दर्शविली होती. परंतु, सहा नक्षत्र कोरडेठाक गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. मघा आणि पूर्वा नक्षत्रात पावसाच्या हजेरीने खरीप पिकास जीवदान मिळाले होते. खरिपाची सुगी करून बळीराजा दिवाळी दणदणीत साजरा करायचा. 
परंतु, यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले. परिणामी दिवाळी झगमगाटात साजरी होत असली तरी शेतकर्‍यांच्या हृदयात मात्र अंधकाराची हुडहुडी भरली आहे. सोयाबीनच्या एका बॅगचा बियाणाचा खर्च २ हजार ७00 रुपये, खतासाठी १ हजार रुपये, फवारणी व मजुरीसाठी ८00 रुपये तर काढणीसाठी १५00 रुपये असा ६ हजार रुपये खर्च आला असून, एका बॅगला उत्पन्न मात्र १00 किलो निघत आहे. 
सोयाबीनला प्रतिक्विंटल २९00 ते ३000 रुपये भाव मिळत असल्याने खर्च निघणे अवघडझाले आहे. एक प्रकारे दिवाळीच्या आनंदावर विरजन पडल्याचे दिसते. काही शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीनचे पीक वाया जावू नये म्हणून सिंचनाची सोय केली. परंतु, भारनियमनामुळे त्यालाही फटका बसला. 
परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे ज्वारी, हरभरा यांची पेर धोक्यात आली आहे. एकंदरीत शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर) 
■ खरिपाची पेर वाया गेली. तर रबीची पेरच धोक्यात आली. सोयाबीनची परिस्थिती पाहता अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या पिकात जनावरे सोडली. अशी विदारक परिस्थिती असतानाही अधिकारी मात्र सरकारला या संदर्भात अंधारात ठेवीत आहेत. महसूल विभागाने वस्तुनिष्ठ आणेवारी काढावी व शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी सूर्यकांत होणराव व नागनाथ साळेगावकर यांनी केली आहे. आर्थिक मदत जाहीर करावी
> खरिपाची पेरणी वाया गेल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखलघेऊन सोयाबीनच्याभावात वाढ करावी, व नुकसानीबद्दल आर्थिक मदत जाहीर करून बळीराजास दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी रमेश तांबे यांनी केली.