शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST

तालुक्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. यावर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने ...

तालुक्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. यावर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी वेळेवर झाली. यामध्ये कापसाचा व सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला. त्याखालोखाल तुरीची पेरणी करण्यात आली होती. पिके बहरात असतानाच सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे कापूस, मूग, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तुरीलाही एकरी उतारा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन घेतले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी कल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे असल्याचे दिसून येत आहे. येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीसाठी ६० शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १०५ शेतकऱ्यांनी व मुगासाठी ४२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु, त्या ठिकाणी अद्यापपर्यंत खरेदी झालीच नसल्याची माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली.